शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पिंपळगावी कांदा व्यापाऱ्यांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 16:31 IST

पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल्याने व्यापाऱ्यांनी कांदाच खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारसमितीत शुकशुकाट बघायला मिळत आहे

ठळक मुद्देदोन टनापर्यंत साठवणुकीची मर्यादा केल्याने निर्णय

पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल्याने व्यापाऱ्यांनी कांदाच खरेदी न करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारसमितीत शुकशुकाट बघायला मिळत आहेशासनाने १४ सप्टेंबरला कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे परतिच्या मुसळधार पावसामुळे खरीपाच्या कांदा पिकावर विपरित परिणाम झाला आहे. आणि पुन्हा आता कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध लादले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांनाही कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे.केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात व्यापार्यांनी बुदत संपाचे हत्यार उगारले. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, मनमाड, नांदगांव, चांदवड, येवला आदी बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद राहणार आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होणार आहे. कांद्याला सध्या चांगला भाव मिळत असतांना या सर्व घटनाक्रमामुळे कांद्याचे भाव घसरणार असून, शेतकऱ्याला त्याचा फटका बसणार आहे.व्यापाऱ्याच्या निर्णयाने शेतकऱ्यांचे नुकसान ......दोन टनापर्यंत कांदा साठवणुकीची मर्यादा व्यापार्यांवर लादल्याने व्यापारी जास्त माल खरेदी करू शकत नाही. त्याचा परिणाम कांदा दरावर होऊन शेतकर्यांचे नुकसानच होणार आहे.कांदा लिलाव बंद हा व्यापाऱ्यांच्या निर्मित नसून तो शासनाच्या निर्णयानुसार झालेला आहे साठवणुकीवर निर्बंध आणल्याने घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी जास्त कांदा खरेदी करू शकत नाही. शिल्लक असलेला माळ डिसप्याच होत नाही तोपर्यंत व्यापारी नव्याने माल खरेदी करू शकत नाही म्हणून हा बंद आहे- प्रदीप दरगुडे कांदा व्यापारी,पिंपळगाव बसवंतकेंद्र सरकारच्या या निर्णयाचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसतो आहे. त्यामुळे जोपर्यंत निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत कांदा विक्रीसाठी नेणार नाही.- माधव चौधरी कांदा उत्पादक शेतकरी,पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये लिलाव बंद असल्याने बाजार आवारात शुकशुकाट होता. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डStrikeसंप