शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा वाढताच टॅँकरची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:24 IST

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण व येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासू लागली असल्याने टॅँकर मागणीत वाढ झाली आहे.

नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण व येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासू लागली असल्याने टॅँकर मागणीत वाढ झाली आहे. येवला व बागलाण या दोन तालुक्यांना जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागलेली असताना प्रशासनाने निव्वळ आडमुठेपणामुळे टॅँकर मंजूर करण्यास तब्बल दीड महिना टाळाटाळ केली. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रशासनाने टॅँकरला मंजुरी दिली असली तरी, अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. उलट मार्चअखेरपासून जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअस तपमान गाठल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर खुद्द गंगापूर धरणात ५९ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना दोन महिने चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ७१ टक्के साठा असून, मे महिन्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गिरणा खोºयात ३० टक्के, तर पालखेड धरण समूहात ३४ टक्केच पाणी शिल्लक आहे.  सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर या चार तालुक्यांतील २१ गावे व एक वाडीसाठी १३ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, येवला तालुक्यातील  १३ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पाणीटंचाई भासणाºया गावांमध्ये गारखेडे, सोमठाण गणेश, सायगाव, कोटखेडे, वसंतनगर, गोरखनगर, पांजरवाडी, शिवाजीनगर, रेंडाळे, आडसुरेगाव, भुलेगाव, अनकाई या गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्णात फक्त ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यात बागलाणला ७ व मालेगावच्या १ टॅँकरचा समावेश होता. त्यामानाने गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही यंदा ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी