शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

उन्हाचा तडाखा वाढताच टॅँकरची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 01:24 IST

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण व येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासू लागली असल्याने टॅँकर मागणीत वाढ झाली आहे.

नाशिक : पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात टॅँकरच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून, उन्हाचा तडाखा वाढताच धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली आहे. नेहमीच अवर्षणग्रस्त असलेल्या बागलाण व येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई भासू लागली असल्याने टॅँकर मागणीत वाढ झाली आहे. येवला व बागलाण या दोन तालुक्यांना जानेवारी महिन्यापासूनच पाण्याची टंचाई भासू लागलेली असताना प्रशासनाने निव्वळ आडमुठेपणामुळे टॅँकर मंजूर करण्यास तब्बल दीड महिना टाळाटाळ केली. फेब्रुवारीच्या अखेरीस प्रशासनाने टॅँकरला मंजुरी दिली असली तरी, अजूनही पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. उलट मार्चअखेरपासून जिल्ह्यात उष्णतेच्या पाऱ्याने ४० अंश सेल्सिअस तपमान गाठल्यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झाली. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहात ५७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर खुद्द गंगापूर धरणात ५९ टक्के पाणी असल्याने नाशिककरांना दोन महिने चिंता करण्याची तशी गरज नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दारणा धरणात ७१ टक्के साठा असून, मे महिन्यात नगर व औरंगाबाद जिल्ह्यासाठी दोन आवर्तने सोडण्यात येणार आहेत. गिरणा खोºयात ३० टक्के, तर पालखेड धरण समूहात ३४ टक्केच पाणी शिल्लक आहे.  सध्या जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, येवला व सिन्नर या चार तालुक्यांतील २१ गावे व एक वाडीसाठी १३ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, येवला तालुक्यातील  १३ गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. पाणीटंचाई भासणाºया गावांमध्ये गारखेडे, सोमठाण गणेश, सायगाव, कोटखेडे, वसंतनगर, गोरखनगर, पांजरवाडी, शिवाजीनगर, रेंडाळे, आडसुरेगाव, भुलेगाव, अनकाई या गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्णात फक्त ८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यात बागलाणला ७ व मालेगावच्या १ टॅँकरचा समावेश होता. त्यामानाने गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस होऊनही यंदा ग्रामीण भागात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी