शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

इंदिरानगरला अनधिकृत व्यवसायांचा वाढता विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:08 IST

परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.इंदिरानगर परिसरात नागपूरच्या धर्तीवर लाखो रुपये खर्च करून वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल असे वाटत होते, परंतु या रस्त्यालगत अनधिकृतपणे पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय सुरू झाल्याने कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे.  वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत इंदिरानगर, साईनाथनगर, विनयनगर, परबनगर, सार्थकनगर, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु या रस्त्यालगतच अनेक ठिकाणी मोकळ्या प्लॉटवर पत्र्यांचे शेड बांधून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. यामध्ये अमृतवर्षा कॉलनीसमोर सुमारे पंधरा ते वीस पत्राच्या शेडमध्ये विविध व्यवसाय आहेत तसेच श्रद्धा विहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि शंभरफुटी रस्ता राजीवनगर झोपडपट्टीच्या दोन्ही बाजूस, पेठेनगर रस्त्यावरील संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर या रस्त्यावरही सुमारे सात आठ पत्र्याचे शेड बांधून विविध व्यवसाय थाटण्यात आले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे व्यवसाय करणाºयांवर अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तातडीने परिसरातील मुख्य अंतर्गत रस्त्यालगत अनधिकृत पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय थाटणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.महापालिकेचे दुर्लक्षआतापर्यंत अनेक वेळा अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय करण्याच्या ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत मनपाच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे, तसेच सदर पत्र्याच्या शेडमधील दुकाने भर लोकवस्तीत असल्याने मोठी दुर्घटना झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या शेडमध्ये खाद्यपदार्थ बनविण्याचे व्यवसाय असल्याने पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.