शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला अनधिकृत व्यवसायांचा वाढता विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:08 IST

परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.इंदिरानगर परिसरात नागपूरच्या धर्तीवर लाखो रुपये खर्च करून वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल असे वाटत होते, परंतु या रस्त्यालगत अनधिकृतपणे पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय सुरू झाल्याने कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे.  वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत इंदिरानगर, साईनाथनगर, विनयनगर, परबनगर, सार्थकनगर, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु या रस्त्यालगतच अनेक ठिकाणी मोकळ्या प्लॉटवर पत्र्यांचे शेड बांधून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. यामध्ये अमृतवर्षा कॉलनीसमोर सुमारे पंधरा ते वीस पत्राच्या शेडमध्ये विविध व्यवसाय आहेत तसेच श्रद्धा विहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि शंभरफुटी रस्ता राजीवनगर झोपडपट्टीच्या दोन्ही बाजूस, पेठेनगर रस्त्यावरील संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर या रस्त्यावरही सुमारे सात आठ पत्र्याचे शेड बांधून विविध व्यवसाय थाटण्यात आले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे व्यवसाय करणाºयांवर अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तातडीने परिसरातील मुख्य अंतर्गत रस्त्यालगत अनधिकृत पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय थाटणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.महापालिकेचे दुर्लक्षआतापर्यंत अनेक वेळा अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय करण्याच्या ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत मनपाच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे, तसेच सदर पत्र्याच्या शेडमधील दुकाने भर लोकवस्तीत असल्याने मोठी दुर्घटना झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या शेडमध्ये खाद्यपदार्थ बनविण्याचे व्यवसाय असल्याने पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.