शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
3
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
4
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
5
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
6
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
7
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
8
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
9
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
10
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
11
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
12
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
13
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
14
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
15
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
16
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
17
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
18
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
19
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
20
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ

इंदिरानगरला अनधिकृत व्यवसायांचा वाढता विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:08 IST

परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

इंदिरानगर : परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यालगतच अनेक ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत व्यवसाय सर्रासपणे केले जात असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी आग लागून मोठी दुर्घटना घडली होती. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.इंदिरानगर परिसरात नागपूरच्या धर्तीवर लाखो रुपये खर्च करून वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेल असे वाटत होते, परंतु या रस्त्यालगत अनधिकृतपणे पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय सुरू झाल्याने कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे.  वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत इंदिरानगर, साईनाथनगर, विनयनगर, परबनगर, सार्थकनगर, समर्थनगर यांसह विविध उपनगरे आहेत. त्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु या रस्त्यालगतच अनेक ठिकाणी मोकळ्या प्लॉटवर पत्र्यांचे शेड बांधून व्यवसाय थाटण्यात आले आहेत. यामध्ये अमृतवर्षा कॉलनीसमोर सुमारे पंधरा ते वीस पत्राच्या शेडमध्ये विविध व्यवसाय आहेत तसेच श्रद्धा विहार कॉलनीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि शंभरफुटी रस्ता राजीवनगर झोपडपट्टीच्या दोन्ही बाजूस, पेठेनगर रस्त्यावरील संत नरहरी चौक ते पेठेनगर कॉर्नर या रस्त्यावरही सुमारे सात आठ पत्र्याचे शेड बांधून विविध व्यवसाय थाटण्यात आले आहेत. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे व्यवसाय करणाºयांवर अतिक्रमण विभाग कारवाई का करत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तातडीने परिसरातील मुख्य अंतर्गत रस्त्यालगत अनधिकृत पत्र्याचे शेड बांधून व्यवसाय थाटणाºयांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.महापालिकेचे दुर्लक्षआतापर्यंत अनेक वेळा अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये व्यवसाय करण्याच्या ठिकाणी आगी लागलेल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत मनपाच्या अतिक्रमण विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे, तसेच सदर पत्र्याच्या शेडमधील दुकाने भर लोकवस्तीत असल्याने मोठी दुर्घटना झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या शेडमध्ये खाद्यपदार्थ बनविण्याचे व्यवसाय असल्याने पुन्हा दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.