शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

पावसाच्या रिपरिपीमुळे पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:17 IST

नाशिक महानगरात सतत बाराव्या दिवसांनंतरही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने गोदाकाठावरील पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूर्णपणे उघड्यावर पडलेले संसार तसेच घरात आलेला गाळ काढून घर धुऊन टाकल्यानंतरही सूर्यदर्शन नसल्याने घर तसेच वाड्यांमधील ओल कायम राहत आहे. वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सततच्या भीजपावसामुळे धोका वाढत आहे.

ठळक मुद्देसराफ बाजारपेठेतील काही दुकाने उघडली

नाशिक : नाशिक महानगरात सतत बाराव्या दिवसांनंतरही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने गोदाकाठावरील पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूर्णपणे उघड्यावर पडलेले संसार तसेच घरात आलेला गाळ काढून घर धुऊन टाकल्यानंतरही सूर्यदर्शन नसल्याने घर तसेच वाड्यांमधील ओल कायम राहत आहे. वाड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सततच्या भीजपावसामुळे धोका वाढत आहे. दरम्यान, गुरुवार सकाळपासून सराफ आणि भांडीबाजारातील काही दुकानदारांनी त्यांची दुकाने पुन्हा खुली केली असली तरी रस्त्यावरील चिखल, गाळाचा त्रास अद्यापही कायम आहे.महानगरात गत आठवड्याच्या प्रारंभापासून पावसाने नाशिककरांना झोडपून काढले आहे. बुधवारी अत्यल्प काळ सूर्यदर्शन झाल्यानंतर पुन्हा पावसाने गत दोन दिवस रिपरिप सुरूच ठेवली आहे. त्यामुळे जुने नाशिक आणि पंचवटी या दोन्ही भागांतील गोदाकाठावरील पूरग्रस्त रहिवाशांच्या समस्या दूर होण्यातील अडचणी कायम आहेत. घरांमधील गाळ अत्यंत चिकट असल्याने कसाबसा काढला असला तरी घरांमधील ओल कायम आहे. त्यामुळे बहुतांश घरे आणि वाड्यांमध्ये कुबट वासदेखील येत आहे. सूर्यदर्शन झाल्यावरच या घरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे, तर पावसाची संततधार कायमच राहिल्याने वाड्यांमधील नागरिकांना अद्यापही भीतीच्या छायेतच रहावे लागत आहे.यंदाच्या पूर आणि त्यानंतरच्या सातत्यपूर्ण प्रत्येक वाड्याचे काही ना काही नुकसान झाले आहे. त्यामुळे वाड्यांमध्ये माती पडणे, एखादी बाजू ढासळणे, गळतीमुळे आतील भागाला पूर्ण ओल येण्यासह असुविधांचा सामना करावा लागत आहे. अनेक वाड्यांतील नागरिकांनी तर दोन-चार दिवसांसाठी आपापल्या नातेवाइकांच्या घरी स्थलांतर केले आहे.