शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा वाढला उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:29 IST

झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : साथीच्या आजारांमध्ये वाढ; डास प्रतिबंधक औषध फवारणीची मागणी

मालेगाव : शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सोयगावसह जिजामाता उद्यान, कॉलन्यांमधील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यावर शेवाळ पसरले असून, त्यात नागरिक टाकत असलेल्या कचऱ्याची भर पडत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे; मात्र महापालिकेच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. दोन ते तीन महिने उलटूनही परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नाही. सायंकाळच्या वेळेस डास व मच्छरांचा उपद्रव वाढत असतो. परतीच्या पावसामुळे अनेक मोकळ्या भूखंडांवर गाजर गवताबरोबरच इतर गवत वाढले आहे. डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. मोकळ्या भूखंडांवर नागरिक कचरा टाकत असल्याने मोठे ढिगारे साचले आहेत. या घाण-कचरा व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थी व वृद्धांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पाण्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी करावी तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. दिवसागणिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. डी.के. चौकातील राजमाता जिजाऊ उद्यानात अजूनही पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना उद्यानात जाता येत नाही. उद्यानातील साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांची उत्पत्ती होत आहे. या भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. उद्यान असून अडचण नसून खोळंबा झाले आहे. उद्यानातील पाण्याचा निचरा करून स्वच्छता मोहीम राबवावी तसेच महापालिका प्रशासनाने नववसाहत भागातील कॉलन्यांकडे लक्ष देऊन धुरळणी व डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.कॉलन्यांमधील रहिवाशी हतबलपरतीच्या पावसामुळे कॉलन्यांना जोडणाºया रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच रस्ते उखडल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात तर मोकळ्या भूखंडांवर घाण, कचरा व पावसाचे डबके साचले आहेत. गटारी नसल्याने पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. महापालिकेच्या प्रभाग व मुख्य कार्यालयात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात फवारणी झालेली नाही. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकही मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकतात. त्यामुळे रोगराई पसरत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- दिव्येश बोरसे, नागरिकमहापालिकेला सर्वाधिक महसूल मिळवून देणाºया सोयगाव व नववसाहत कॉलनींच्या नागरी सुविधांकडे मनपा प्रशासनाने सर्रास दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, गटार या मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डास, मच्छरांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे.- प्रितेश शर्मा, नागरिक

टॅग्स :Healthआरोग्य