शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा वाढला उपद्रव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 23:29 IST

झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ठळक मुद्देमालेगाव : साथीच्या आजारांमध्ये वाढ; डास प्रतिबंधक औषध फवारणीची मागणी

मालेगाव : शहर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अजूनही नववसाहत भागातील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, डास, मच्छर, चिलट्यांचा उपद्रव वाढला आहे तर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. महापालिकेने परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.सोयगावसह जिजामाता उद्यान, कॉलन्यांमधील मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यावर शेवाळ पसरले असून, त्यात नागरिक टाकत असलेल्या कचऱ्याची भर पडत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे; मात्र महापालिकेच्या प्रशासनाने याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे. दोन ते तीन महिने उलटूनही परिसरात डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नाही. सायंकाळच्या वेळेस डास व मच्छरांचा उपद्रव वाढत असतो. परतीच्या पावसामुळे अनेक मोकळ्या भूखंडांवर गाजर गवताबरोबरच इतर गवत वाढले आहे. डुकरांचा सुळसुळाट वाढला आहे. मोकळ्या भूखंडांवर नागरिक कचरा टाकत असल्याने मोठे ढिगारे साचले आहेत. या घाण-कचरा व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विद्यार्थी व वृद्धांच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पाण्यामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाने औषध फवारणी करावी तसेच पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. दिवसागणिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. डी.के. चौकातील राजमाता जिजाऊ उद्यानात अजूनही पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना उद्यानात जाता येत नाही. उद्यानातील साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डास व मच्छरांची उत्पत्ती होत आहे. या भागातील नागरिक अक्षरश: वैतागले आहेत. उद्यान असून अडचण नसून खोळंबा झाले आहे. उद्यानातील पाण्याचा निचरा करून स्वच्छता मोहीम राबवावी तसेच महापालिका प्रशासनाने नववसाहत भागातील कॉलन्यांकडे लक्ष देऊन धुरळणी व डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांकडून केली जात आहे.कॉलन्यांमधील रहिवाशी हतबलपरतीच्या पावसामुळे कॉलन्यांना जोडणाºया रस्त्यांची चाळण झाली आहे. सर्वच रस्ते उखडल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने हाकावी लागतात तर मोकळ्या भूखंडांवर घाण, कचरा व पावसाचे डबके साचले आहेत. गटारी नसल्याने पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. महापालिकेच्या प्रभाग व मुख्य कार्यालयात वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून परिसरात फवारणी झालेली नाही. त्यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकही मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकतात. त्यामुळे रोगराई पसरत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- दिव्येश बोरसे, नागरिकमहापालिकेला सर्वाधिक महसूल मिळवून देणाºया सोयगाव व नववसाहत कॉलनींच्या नागरी सुविधांकडे मनपा प्रशासनाने सर्रास दुर्लक्ष केले आहे. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते, गटार या मूलभूत सुविधादेखील मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. मोकळ्या भूखंडांवर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे डास, मच्छरांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे.- प्रितेश शर्मा, नागरिक

टॅग्स :Healthआरोग्य