शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

चिकटा या रोगांचे अतिक्र मण वाढल्याने पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 14:42 IST

पाटोदा ( गोरख घुसळे ):- ज्वारीचे पिक हे सध्या अंतिम टप्प्यात आले आहे.कणसे दाण्याने भरली आहे.मात्र हवामानातील बदलामुळे या पिकावर प्रचंड मोठया प्रमाणावर मावा व चिकटा या रोगांचे अतिक्र मण वाढल्याने संपूर्ण पिक धोक्यात आले आहे . दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला तालुक्यातील शेतकº्यांना निसर्गाच्याच्या लहरीपणामुळे फटका बसत आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण कणीस व पानावर तसेच ज्वारीच्या ताटावर चिकटा पडल्याने पूर्ण पिक खराब झाले आहे.

सतत वातावरणातील बदलामुळे सर्वच पिकांवर रोगांचे प्रमाण वाढले असल्याने कोणत्याही औषधांची मात्रा लागू पडत नसल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.ज्वारी पिकावर मोठया प्रमाणावर तांबूस फिकट रंगाचा मावा रोग पडला आहे.तर ज्वारीवरील मावा व चिकटा विषारी असून कणसातील ज्वारी खाण्यायोग्य नसून कडबाही जनावरांना चारणे हानिकारक असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्यांनी दिली . वातावरणातील बदलामुळे ज्वारी पिकावर एवढया मोठया प्रमाणावर मावा व चिकटा पडला आहे. कणसावर पडलेल्या मावा व चिकट्याने संपूर्ण कणीस हे काळे पडले असून त्यातील धान्य खराब होत आहे.गेल्या अनेक वर्षात इतक्या मोठया प्रमाणात ज्वारी पिकावर मावा व चिकटा रोग पडला नसल्याची माहिती शेतकरी वर्गाने दिली आहे.खरीप हंगामात अवकाळी पावसाने शेतातील सर्वच पिके खराब झाल्याने जनावरांच्या चाº्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या भागातील बहुतेक शेतकºयांनी जनावरांच्या चाº्यासाठी कडबा उपलब्ध होईल म्हणून गावठी मालदांडी ज्वारीची लागवड करण्यास प्राधान्य देत मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड केली आहे. पिक मोठे होऊन आता कडबा व धान्य उपलब्ध होईल या आशेवर असलेल्या शेतकº्यांची निसर्गाने घोर निराशा केली आहे.पिकावर मावा तसेच चिकटा पडल्याने संपूर्ण पिकच धोक्यात आले आहे.शेतकº्यांपुढे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे.