शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

येवला तालुक्यात भाजीपाला लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 01:01 IST

जळगाव नेऊर : कायम दुष्काळाची झळा सोसणारा तालुका म्हणून येवला तालुक्याकडे बघितले जात होते, पण हळूहळू येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक मका, सोयाबीन, कांदा, कपाशी या पिकांबरोबरच कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तिखट मिरची, टोमॅटो, कोथंबीर या अल्प पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी आकर्षित झाल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे.

ठळक मुद्देपारंपरिक पिकात बदल : कोबी, फ्लॉवर, मिरची, टोमॅटो पेरणीत वाढ

जळगाव नेऊर : कायम दुष्काळाची झळा सोसणारा तालुका म्हणून येवला तालुक्याकडे बघितले जात होते, पण हळूहळू येथील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून पारंपरिक मका, सोयाबीन, कांदा, कपाशी या पिकांबरोबरच कोबी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, तिखट मिरची, टोमॅटो, कोथंबीर या अल्प पाण्यावर येणाऱ्या भाजीपाला पिकांकडे मोठ्या प्रमाणात तरुण शेतकरी आकर्षित झाल्याने तालुक्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे.पूर्वी निफाड, दिंडोरी, कसमा पट्ट्यात शेतकऱ्यांचा भाजीपाला नाशिक, पिंपळगाव बसवंत बाजार समिती काबीज करत होता. पण आता येवला तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, ढोबळी मिरची, कोथिंबीर, तिखट मिरची पिकांची लागवड केल्याने अनेक शेतकऱ्यांचे उत्पादनही सुरू झाल्याने चांगले बाजारभाव मिळाले, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होणार आहे.दिवसेंदिवस तरुण नोकरीच्या मागे न धावता शेती व्यवसायाकडे जोर देत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकांचे उत्पादन सुरू झाले असून नाशिकसह राज्य, परराज्यात विक्री करत आहे.चौकट...कमी पाण्यात जास्त उत्पादनसध्या येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अजूनही विहिरी, नदी-नाले, बोरवेल कोरडी असल्याने पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. पण शेतकऱ्यांनी आपले शेततळे, विहीर या साधनातील थोड्या पाण्यावर ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मल्चिंग पेपर इत्यादी साधनांचा उपयोग केल्याने कमी पाण्यातही जास्त उत्पादन शेतकरी घेत आहे, त्यामुळे मनुष्यबळ कमी लागत असून मल्चिंग पेपरमुळे औषधांच्या खर्चाबरोबरच तणाचाही बंदोबस्त होत आहे.सुशिक्षित तरुण वळाले शेतीकडेगेली दोन वर्षांपासून कोरोना संसर्ग साथीमुळे अनेक तरुणांच्या नोकऱ्यांवर गदा आल्याने मोठ्या प्रमाणात सुशिक्षित तरुण शेतीकडे वळाले असून शेतात नवनवीन प्रयोग करून, शेतात विविध प्रकारची पिके घेऊन चार पैसे कमावण्यात व्यस्त आहे.नर्सरीमध्ये रोपांची बुकिंगपूर्वी शेतकरी आपल्या शेतात रोपे तयार करून त्यांची लागवड करत होता. आता त्यामध्ये शेतकऱ्यांनी बदल करून नर्सरीमध्ये रोपे बुक करून लागवडीसाठी दिलेल्या तारखेला रोपे मिळत असल्याने शेतकरी त्या पद्धतीने लागवड करत आहे.कोट...दरवर्षी मका, सोयाबीन पिके घेत होतो. यावर्षी या पारंपरिक पिकाबरोबर कोबी आणि मिरचीचे पीक घेतले आहे. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन यामुळे कमी पाण्याबरोबर मेहनतीला सोपे जाते. बाजारभाव चांगले मिळाल्यास पुढील पिकांसाठी भांडवल निर्माण होऊन चार पैसे पदरात पडतील.- अनिल चव्हाण, शेतकरी.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती