शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

निफाडमध्ये पेरणी क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:24 IST

निफाड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन : भाजीपाल्याला दर नसल्याने सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल

निफाड : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे.तालुक्यात सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घेतली जातात. यावर्षी सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट १८,८४१ हेक्टर, मक्याचे १४,२१५ हे., बाजरीचे ४५७, भुईमूग ९५०, तुरीचे ४७०, मुगाचे ४६६, उडीद ६१६, तर कापसाचे ८० हेक्टर प्रस्तावित आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका यांची पातळी बºयापैकी टिकून आहे. तालुक्याचे जे खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हे. आहे, त्यापेक्षा जास्त ३५,४७५ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी जुलैअखेर तालुक्यात १४३ टक्के खरिपाची पेरणी झाली होती, मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा सोयाबीन व मक्याच्या उत्पादनावर परिणाम झाला होता.मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा, मका व इतर पिके काढलेली आहेत. त्यामुळे शेतात नांगरणी, रोटरी, फळी मारून शेतीची मशागत करून ठेवलेली आहे. सध्या सोयाबीन पेरणीयोग्य पाऊस पडत असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची बियाणे विकत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणाला मागणी वाढली आहे. रसवंत्या बंद असल्याने उन्हाळ्यात उसाला अत्यंत कमी म्हणजे १,००० ते १३०० रुपये दर मिळाल्याने ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत.बी-बियाणांच्या दुकानांसमोर बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. काही शेतकरी घरगुती सोयाबीनचे बियाणे विकत घेत आहेत. यावर्षी कोरोनामुळे भाजीपाल्यासह फळपिकांना दर न मिळाल्याने शेतकºयांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल वाढू शकतो. शेतकºयांनी ऊस लागवडीस प्रारंभ केला आहे. बाजरी, भुईमूग, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरण्याची तयारी केली आहे. मात्र तालुक्यात बाजरी, भुईमूग, मूग, उडीद आदी पिके कमी प्रमाणात घेतली जातात. यावर्षी उसाला लॉकडाऊनमुळे दर मिळाला नाही.

यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. यावर्षी सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. तणनाशक पाण्यात मिसळून पाठीवरच्या पंपाच्या साहाय्याने मका पीक पेरणीनंतर लगेच जमिनीवर फवारावे. सध्या शेतकºयांकडे घरचे सोयाबीनची बियाणे उपलब्ध असेल तर ती पेरावी, पेरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी, रासायनिक खताबाबत काही अडचण आल्यास तालुका कृषी अधिकाºयाशी संपर्क साधावा.- बटू पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी