शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

निफाडमध्ये पेरणी क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:24 IST

निफाड तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन : भाजीपाल्याला दर नसल्याने सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल

निफाड : तालुक्यात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप पेरणीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे चित्र आहे. तालुक्यात खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हेक्टर इतके आहे.तालुक्यात सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद, भुईमूग आदी पिके घेतली जातात. यावर्षी सोयाबीन पेरणीचे उद्दिष्ट १८,८४१ हेक्टर, मक्याचे १४,२१५ हे., बाजरीचे ४५७, भुईमूग ९५०, तुरीचे ४७०, मुगाचे ४६६, उडीद ६१६, तर कापसाचे ८० हेक्टर प्रस्तावित आहे. मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका यांची पातळी बºयापैकी टिकून आहे. तालुक्याचे जे खरिपाचे निर्धारित क्षेत्र २४,७५० हे. आहे, त्यापेक्षा जास्त ३५,४७५ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी जुलैअखेर तालुक्यात १४३ टक्के खरिपाची पेरणी झाली होती, मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने त्याचा सोयाबीन व मक्याच्या उत्पादनावर परिणाम झाला होता.मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा, मका व इतर पिके काढलेली आहेत. त्यामुळे शेतात नांगरणी, रोटरी, फळी मारून शेतीची मशागत करून ठेवलेली आहे. सध्या सोयाबीन पेरणीयोग्य पाऊस पडत असल्याने शेतकºयांनी सोयाबीनची बियाणे विकत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणाला मागणी वाढली आहे. रसवंत्या बंद असल्याने उन्हाळ्यात उसाला अत्यंत कमी म्हणजे १,००० ते १३०० रुपये दर मिळाल्याने ऊस उत्पादक हवालदिल झाले आहेत.बी-बियाणांच्या दुकानांसमोर बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. काही शेतकरी घरगुती सोयाबीनचे बियाणे विकत घेत आहेत. यावर्षी कोरोनामुळे भाजीपाल्यासह फळपिकांना दर न मिळाल्याने शेतकºयांचा सोयाबीन पीक घेण्याकडे कल वाढू शकतो. शेतकºयांनी ऊस लागवडीस प्रारंभ केला आहे. बाजरी, भुईमूग, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरण्याची तयारी केली आहे. मात्र तालुक्यात बाजरी, भुईमूग, मूग, उडीद आदी पिके कमी प्रमाणात घेतली जातात. यावर्षी उसाला लॉकडाऊनमुळे दर मिळाला नाही.

यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केल्याने सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात वाढ होऊ शकते. यावर्षी सोयाबीन पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. तणनाशक पाण्यात मिसळून पाठीवरच्या पंपाच्या साहाय्याने मका पीक पेरणीनंतर लगेच जमिनीवर फवारावे. सध्या शेतकºयांकडे घरचे सोयाबीनची बियाणे उपलब्ध असेल तर ती पेरावी, पेरण्यापूर्वी त्याची उगवणक्षमता तपासून घ्यावी, रासायनिक खताबाबत काही अडचण आल्यास तालुका कृषी अधिकाºयाशी संपर्क साधावा.- बटू पाटील, तालुका कृषी अधिकारी, निफाड

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी