शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

हजारो मिळकतींना  वाढीव भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:52 IST

महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्यासाठी अनेकदा महापालिकेत चकरा मारल्या तेव्हा आता सर्वेक्षण चालू आहे

नाशिक : महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्यासाठी अनेकदा महापालिकेत चकरा मारल्या तेव्हा आता सर्वेक्षण चालू आहे आता घरपट्टी लागू करता येणार नाही असे सांगून मिळकतधारकांना परत पाठविण्यात आले आणि आता सुधारित दरामुळे या मिळकतींना घरपट्टी लागू होणार असल्याने महापालिकेच्या नकाराचा अकारण भुर्दंड या मिळकतधारकांना सोसावा लागणार आहे.महापालिका हद्दीतील शेकडो मिळकतींना घरपट्टी नाही अनेकांनी अस्तित्वातील घरांच्या बांधकामात बदलदेखील केले होते. त्याचे सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू होते. याच दरम्यान अनेक नवीन इमारती झाल्या तसेच अतिरिक्तबांधकाम करणाऱ्या मिळकतधारकांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालय आणि मुख्यालयातदेखील येऊन घरपट्टी लागू करण्याची मागणी केली होती त्यावेळी आता सर्वेक्षण सुरू आहे. ते संपल्यानंतरच घरपट्टी लागू होईल, असे संबंधितांना सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांचे घरपट्टी नावावर करण्याचे अर्जदेखील दाखल करून घेतले नाही. सर्वेक्षण दाखल झाल्यानंतर घरपट्टी लागू होईल म्हणून आश्वस्त झालेल्या मिळकतधारकांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र दरवाढीचा शॉक दिला.फेबु्रवारी महिन्यात दाखल झालेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिलपासून घरपट्टीसाठी आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली आहे. अशाप्रकारे दरवाढ होईल याची पुसटशी कल्पना नसलेल्या ६२ हजार मिळकतधारकांना मोठा धक्का बसला आहे.या यंत्रणेचा काय उपयोग?शहरात नवीन इमारत अथवा घर बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगररचना विभागाच्या वतीने संबंधितांना पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. त्याचीच एक प्रत घरपट्टी विभागाला दिली जाते. कर लागू करणे ही संबंधित नागरिकांबरोबरच मनपाचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे खरे तर नागरिकांनी अर्ज न करताच महापालिकेने संबंधितांकडून कागदपत्रे मागविली जाऊ शकतात, परंतु असे काहीच होत नाही. नगररचना विभागाने कळवूनही कर्मचारी घरपट्टी लागू करीत नसतील आणि घरपट्टी लागू करण्यासाठी चिरीमिरीची अपेक्षा बाळगून असतील तर मग नागरिकांचा काय दोष, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका