शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

हजारो मिळकतींना  वाढीव भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:52 IST

महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्यासाठी अनेकदा महापालिकेत चकरा मारल्या तेव्हा आता सर्वेक्षण चालू आहे

नाशिक : महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्यासाठी अनेकदा महापालिकेत चकरा मारल्या तेव्हा आता सर्वेक्षण चालू आहे आता घरपट्टी लागू करता येणार नाही असे सांगून मिळकतधारकांना परत पाठविण्यात आले आणि आता सुधारित दरामुळे या मिळकतींना घरपट्टी लागू होणार असल्याने महापालिकेच्या नकाराचा अकारण भुर्दंड या मिळकतधारकांना सोसावा लागणार आहे.महापालिका हद्दीतील शेकडो मिळकतींना घरपट्टी नाही अनेकांनी अस्तित्वातील घरांच्या बांधकामात बदलदेखील केले होते. त्याचे सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू होते. याच दरम्यान अनेक नवीन इमारती झाल्या तसेच अतिरिक्तबांधकाम करणाऱ्या मिळकतधारकांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालय आणि मुख्यालयातदेखील येऊन घरपट्टी लागू करण्याची मागणी केली होती त्यावेळी आता सर्वेक्षण सुरू आहे. ते संपल्यानंतरच घरपट्टी लागू होईल, असे संबंधितांना सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांचे घरपट्टी नावावर करण्याचे अर्जदेखील दाखल करून घेतले नाही. सर्वेक्षण दाखल झाल्यानंतर घरपट्टी लागू होईल म्हणून आश्वस्त झालेल्या मिळकतधारकांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र दरवाढीचा शॉक दिला.फेबु्रवारी महिन्यात दाखल झालेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिलपासून घरपट्टीसाठी आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली आहे. अशाप्रकारे दरवाढ होईल याची पुसटशी कल्पना नसलेल्या ६२ हजार मिळकतधारकांना मोठा धक्का बसला आहे.या यंत्रणेचा काय उपयोग?शहरात नवीन इमारत अथवा घर बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगररचना विभागाच्या वतीने संबंधितांना पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. त्याचीच एक प्रत घरपट्टी विभागाला दिली जाते. कर लागू करणे ही संबंधित नागरिकांबरोबरच मनपाचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे खरे तर नागरिकांनी अर्ज न करताच महापालिकेने संबंधितांकडून कागदपत्रे मागविली जाऊ शकतात, परंतु असे काहीच होत नाही. नगररचना विभागाने कळवूनही कर्मचारी घरपट्टी लागू करीत नसतील आणि घरपट्टी लागू करण्यासाठी चिरीमिरीची अपेक्षा बाळगून असतील तर मग नागरिकांचा काय दोष, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका