शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

हजारो मिळकतींना  वाढीव भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:52 IST

महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्यासाठी अनेकदा महापालिकेत चकरा मारल्या तेव्हा आता सर्वेक्षण चालू आहे

नाशिक : महापालिकेने चालू आर्थिक वर्षांपासून घरपट्टीचा आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली असल्याने पूर्णत्वाचा दाखला नसलेल्या ६२ हजार मिळकतींना वाढीव घरपट्टीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे, परंतु त्याचबरोबर शेकडो इमारत किंवा घरमालकांनी घरपट्टी लागू करण्यासाठी अनेकदा महापालिकेत चकरा मारल्या तेव्हा आता सर्वेक्षण चालू आहे आता घरपट्टी लागू करता येणार नाही असे सांगून मिळकतधारकांना परत पाठविण्यात आले आणि आता सुधारित दरामुळे या मिळकतींना घरपट्टी लागू होणार असल्याने महापालिकेच्या नकाराचा अकारण भुर्दंड या मिळकतधारकांना सोसावा लागणार आहे.महापालिका हद्दीतील शेकडो मिळकतींना घरपट्टी नाही अनेकांनी अस्तित्वातील घरांच्या बांधकामात बदलदेखील केले होते. त्याचे सर्वेक्षण महापालिकेच्या वतीने गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू होते. याच दरम्यान अनेक नवीन इमारती झाल्या तसेच अतिरिक्तबांधकाम करणाऱ्या मिळकतधारकांनी महापालिकेच्या विभागीय कार्यालय आणि मुख्यालयातदेखील येऊन घरपट्टी लागू करण्याची मागणी केली होती त्यावेळी आता सर्वेक्षण सुरू आहे. ते संपल्यानंतरच घरपट्टी लागू होईल, असे संबंधितांना सांगण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांचे घरपट्टी नावावर करण्याचे अर्जदेखील दाखल करून घेतले नाही. सर्वेक्षण दाखल झाल्यानंतर घरपट्टी लागू होईल म्हणून आश्वस्त झालेल्या मिळकतधारकांना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मात्र दरवाढीचा शॉक दिला.फेबु्रवारी महिन्यात दाखल झालेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी १ एप्रिलपासून घरपट्टीसाठी आधार असलेल्या वार्षिक भाडेमूल्यात वाढ केली आहे. अशाप्रकारे दरवाढ होईल याची पुसटशी कल्पना नसलेल्या ६२ हजार मिळकतधारकांना मोठा धक्का बसला आहे.या यंत्रणेचा काय उपयोग?शहरात नवीन इमारत अथवा घर बांधण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नगररचना विभागाच्या वतीने संबंधितांना पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. त्याचीच एक प्रत घरपट्टी विभागाला दिली जाते. कर लागू करणे ही संबंधित नागरिकांबरोबरच मनपाचीदेखील जबाबदारी आहे. त्यामुळे खरे तर नागरिकांनी अर्ज न करताच महापालिकेने संबंधितांकडून कागदपत्रे मागविली जाऊ शकतात, परंतु असे काहीच होत नाही. नगररचना विभागाने कळवूनही कर्मचारी घरपट्टी लागू करीत नसतील आणि घरपट्टी लागू करण्यासाठी चिरीमिरीची अपेक्षा बाळगून असतील तर मग नागरिकांचा काय दोष, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका