शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

वाढीव वीज बिलांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 01:12 IST

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सत्तेत आलेले सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई बेरोजगारीत वाढ होत असून जीवनावश्यक वस्तूंबरोबर पेट्रोल, डिजेल, गॅसचे दर वाढले आहे. त्यातच भर म्हणून वीजदर वाढीचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पंचवटी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देराष्टÑवादीचे आंदोलन : वीज वितरण कंपनीला निवेदन

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सत्तेत आलेले सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरले आहे. महागाई बेरोजगारीत वाढ होत असून जीवनावश्यक वस्तूंबरोबर पेट्रोल, डिजेल, गॅसचे दर वाढले आहे. त्यातच भर म्हणून वीजदर वाढीचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पंचवटी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून निवेदन देण्यात आले.कृषी वीजदरातदेखील ५ ते ६ टक्के वाढ केल्याने अगोदरच शेतमालाला भाव नाही. अनेक ठिकाणी पेरण्या झालेल्या नाही, तर काही ठिकाणी दुबार पेरणीच्या संकटांना बळीराजाला सामोरे जावे लागत आहे. सदर दरवाढ अन्यायकारक व जुलमी असून, दरवाढीचा व शासनाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी ओबीसी सेल शहराध्यक्ष अ‍ॅड. सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निषेध नोंदवून वीज वितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी केली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना सदर दरवाढ मागे घ्यावी, दिल्लीच्या धर्तीवर वीज दर आकारणी करावी, एकलहरा वीज निर्मिती केंद्र नाशिकमधून हलवू नये, केंद्राची वीज निर्मिती क्षमता वाढवावी. ओव्हरहेड वायर्स काढून भूमिगत वायर्स व बंच कंडक्टरचा वापर करावा. जुन्या वायर्सचे जाळे काढावे, वीज बिले रिडिंग घेऊन महिन्याला देयके अदा करावी, असे निवेदन देण्यात आले. यावेळी अ‍ॅड.सुरेश आव्हाड, प्रकाश माळोदे, मोहिय्योद्दिन हाजी शेख, अरविंद सोनवणे, नामदेव गाडेकर, नासिर पठाण, श्याम तावरे, अ‍ॅड. संदीप दंडगव्हाण, शिवाजी घुगे, आशा निकम, उर्मिला शहाणी, आनंद सूर्यवंशी, दिनेश रौंदळ उपस्थित होते.