शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सर्दी-खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:16 IST

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे संसर्गजन्य आजारात वाढ झाली असून, यामुळे सर्दी आणि खोकल्याचे आजार अनेकांना जडले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्दी, खोकल्याने असंख्य रुग्ण हैराण झाले आहेत. यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे.एका ऋतूतून दुसºया ऋतूत जाताना निर्माण होणाºया नैसर्गिक बदलाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो. यातच यंदा झालेला पाऊस आणि सप्टेंबरच्या अखेरच्या चरणात जाणवणारी थंडी यामुळे मागील आठवड्यापासून रुग्णांची संख्या अधिक वाढल्याचे चित्र आहे. पाऊस मुबलक झाला असला तरी लहरी पावसामुळेही नैसर्गिक साखळीला काही प्रमाणात धक्का बसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.सर्दी, खोकला तसेच ताप असे आजार अनेकांना जडले आहेत.यामुळे सरकारी रुग्णालयातील बाह्यरुण विभागात रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होत आहेत तर महापालिकेच्या रुग्णालयामध्ये देखील उपचारासाठी येणाºयाचे प्रमाण ५० टक्क्याने वाढल्याचे सांगितले जाते. लहान मुलांमध्ये आणि बालकांमध्ये सर्दी तसेच कफचे प्रमाण अधिक आहे. यामुळे वाफ घेणाºयांची संख्या रुग्णालयात अधिक आहे. काहींना रोजच रुग्णालयात जाणेही खर्चिक वाटू लागल्याने नेब्युलाईन मशीन (वाफ मशीन) ही खेरदी केले जात आहे. वेळीच काळजी घ्यावीसध्या संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढले आहे. शक्यतो तेलकट, अंबट पदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे त्यामुळे आजार बळावण्याची शक्यता असते. शिंकताना नाकाला रुमाल लावावा, इतरांनाही काळजी घेण्यास सांगावे, चार दिवसांपेक्षा अधिक दिवस खोकला असेल तर तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावे. ज्यांना धुळीची अलर्जी आहे त्यांनी काळजी घ्यावी. - डॉ. संजय देशमुख