शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

कांदा लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:47 IST

येवला तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली. मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन कापणीच्या वेळेस खरीप हंगामाचे नुकसान झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला. शेतातील नगदी पिके, मका, सोयाबीन, बाजरी, पोळ कांदा व कांदा रोपांचे नुकसान झाले. आशाही परिस्थितीत ओल्या दुष्काळाचे दु:ख बाजूला सारून शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या विक्रमी बाजारभावामुळे कांदा लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे.

ठळक मुद्देमका, सोयाबीन, बाजरी, पोळ कांदा व कांदा रोपांचे नुकसान

पाटोदा : सतत दुष्काळाशी सामना करणाऱ्या येवला तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिके चांगली आली. मात्र आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने ऐन कापणीच्या वेळेस खरीप हंगामाचे नुकसान झाले. या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला. शेतातील नगदी पिके, मका, सोयाबीन, बाजरी, पोळ कांदाकांदा रोपांचे नुकसान झाले. आशाही परिस्थितीत ओल्या दुष्काळाचे दु:ख बाजूला सारून शेतकरीवर्गाने रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या कांद्याला मिळत असलेल्या विक्रमी बाजारभावामुळे कांदा लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. येवला तालुक्यात रब्बी व उन्हाळी कांदा लागवड क्षेत्र हे दहा हजार हेक्टर आहे. मात्र आजमितीस २१,५७८ हेक्टर आशा विक्रमी क्षेत्रावर कांदा लागवड झालेली असून, येत्या महिनाभरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गतवर्षाच्या तुलनेत गव्हाचा पेरा तिपटीने वाढला आहे. हरभरा पिकाची लागवड गत वर्षाच्या तुलनेत दुपटीने, तर ज्वारीचा पेरा निम्याने घटला असून, मका पिकाला शेतकºयांनी टाटा केला आहे. तालुक्यात रब्बी मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६४ हेक्टर आहे मात्र आजमितीस मकाचा पेरा निरंक आहे. अवकाळी पावसाने कांदा पिकाचे तसेच रोपांचे नुकसान झाल्याने खरीप हंगामातील कांदा पिकाच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तसेच पालखेड कालव्याच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याने बंधारे, तलाव भरल्याने तसेच विहिरी व बोअरवेल्स यांना पाणी उतरल्याने मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.हवामानबदलाचा रब्बीला धोकायेवला तालुक्यात गेल्या महिनाभरापासून ढगाळ वातावरण तसेच धुके व दव पडत असल्यामुळे गव्हावर तांबेरा, हरभरा पिकावर मावा व अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे, तर कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. खरीप हंगाम अवकाळी पावसाने हिरावला तर रब्बी हंगामावर रोगाचे सावट पसरले आहे. रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकरीवर्ग महागडी औषधांची फवारणी करीत आहे; मात्र वातारणात सतत बदल होत असल्याने रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढतच असल्याने शेतकºयांच्या रब्बी हंगामाबाबतच्या आशा धूसर झाल्या आहेत.ज्वारीचा पेरा तिपटीने घटलायेवला तालुक्यात रब्बी हंगामातील तृणधान्य, कडधान्य, तेलपीक या पिकांसाठी ९७९० हेक्टर क्षेत्र पेरणीयोग्य असून, ७२७४ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे, तर गत वर्षीच्या तुलनेत अडीचपट वाढ झाली आहे. मागील वर्षी फक्त ३०४२.५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी दिली आहे. रब्बी ज्वारीचे पेरणीयोग्य ८२४ हेक्टर १५४ हेक्टर क्षेत्रावर सरासरी १९ पेरणी झाली आहे. गतवर्षी तुलनेत ज्वारीचा पेरा तिपटीने घटला आहे. मागील वर्षी ५११.५ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला होता. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ५५४८ हेक्टर असून, मागील वर्षाच्या तुलनेत चार पट वाढ झाली आहे.येवला तालुक्यातील रब्बीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. रब्बी कांदा उन्हाळ कांद्यापाठोपाठ गहू व हरभरा क्षेत्रातही वाढ झाली आहे. शेतकरीवर्ग एकच पीक घेत असल्याने सर्व माल बाजारात एकाच वेळी विक्र ीला येत असून, शेतकºयांना आपला शेतमाल मातीमोल भावात विकावा लागत असल्याने शेतकरीवर्गाने पर्यायी पिकांची लागवड केल्यास उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.- कारभारी नवले,कृषी अधिकारी, येवला

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा