शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

दिशादर्शक फलक नसल्याने अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:28 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्यावर िजेची सोय करावी, अशी मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : व्हीटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्ता धोक्याचा

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्यावर िजेची सोय करावी, अशी मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली आहे.बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी हा रस्ता नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा व सतत रहदारीने गजबजलेला अतिशय महत्त्वाचा समजला जातो. बेलगाव ते व्हीटीसी दरम्यान असलेल्या या रस्त्यावर अनेक वळणदार मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. यामुळे या वळणदार असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने चालकांना समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताला सामोरे जाण्याच्या घटना वाढत आहेत.दोन दिवसांपूर्वी एक वॅगन आर गाडी या ठिकाणी वीजेची सुविधा नसल्यामुळे पलटी झाली. तसेच हा रस्ता जंगल भागातून जात असल्याने या परिसरात जंगली हिंस्र प्राण्यांचा रात्रीच्या वेळी रस्त्यावर वावर असल्यामुळे या रस्त्याला विजेची सोय करण्यात यावी.ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणावर जाणारे पर्यटक याच रस्त्याने जात असतात. तसेच परिसरातील व्यावसायिक, औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगारासाठी जाणारे कामगार रात्रीच्या वेळी जात असतात. शिवाय नाशिकला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावर महिन्याभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात