शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

दिशादर्शक फलक नसल्याने अपघातात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 18:28 IST

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्यावर िजेची सोय करावी, अशी मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : व्हीटीसी फाटा ते बेलगाव कुऱ्हे रस्ता धोक्याचा

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी या ८ किलोमीटर असणाऱ्या रस्त्याला दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय नसल्यामुळे या रस्त्यावर महिनाभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच रस्त्यावर िजेची सोय करावी, अशी मागणी व्यावसायिक तसेच नागरिकांनी केली आहे.बेलगाव कुऱ्हे ते व्हीटीसी हा रस्ता नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा व सतत रहदारीने गजबजलेला अतिशय महत्त्वाचा समजला जातो. बेलगाव ते व्हीटीसी दरम्यान असलेल्या या रस्त्यावर अनेक वळणदार मार्ग असून रस्त्याच्या दुतर्फा झाडे आहेत. यामुळे या वळणदार असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने चालकांना समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताला सामोरे जाण्याच्या घटना वाढत आहेत.दोन दिवसांपूर्वी एक वॅगन आर गाडी या ठिकाणी वीजेची सुविधा नसल्यामुळे पलटी झाली. तसेच हा रस्ता जंगल भागातून जात असल्याने या परिसरात जंगली हिंस्र प्राण्यांचा रात्रीच्या वेळी रस्त्यावर वावर असल्यामुळे या रस्त्याला विजेची सोय करण्यात यावी.ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणावर जाणारे पर्यटक याच रस्त्याने जात असतात. तसेच परिसरातील व्यावसायिक, औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगारासाठी जाणारे कामगार रात्रीच्या वेळी जात असतात. शिवाय नाशिकला जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावर महिन्याभरापासून अपघातांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच विजेची सोय करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात