शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दाखले बंद झाल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:30 IST

अधिकार नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांंकडून दिले जाणारे विविध प्रकारचे शासकीय व कृषी दाखले देण्यास गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होऊ लागली असून, त्याचा फटका शैक्षणिक कारणांसाठी विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण होत असताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहेत.

नाशिक : अधिकार नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांंकडून दिले जाणारे विविध प्रकारचे शासकीय व कृषी दाखले देण्यास गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होऊ लागली असून, त्याचा फटका शैक्षणिक कारणांसाठी विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण होत असताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहेत.दैनंदिन शासकीय कामासाठी लागणारे उत्पन्न, वारस, रहिवास यासह जवळपास वीस प्रकारचे दाखले आजवर तलाठी व मंडळ अधिकाºयांकडून दिले जात होते. परंतु मध्यंतरीच्या काळात काही न्यायिक प्रकरणांमध्ये न्यायालयांनी तलाठी, मंडळ अधिकाºयांना धारेवर धरत नोटिसा काढल्या तसेच शासनालाही नोटिसा बजावून तलाठ्यांना कायदेशीर अधिकार नसताना दाखले देण्याचे कारण काय, अशी विचारणा केली होती. मुळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठ्यांकडून आपल्याच अधिकारात सदरचे दाखले दिले जात असताना त्यातून वाद होऊ लागल्याने तलाठ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेने २ आॅक्टोबरपासून कोणतेही दाखले देण्यास नकार दिला आहे. तलाठ्यांच्या या कृतीमुळे मात्र सामान्य जनता व विशेष करून शेतकरी वर्गाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. रहिवास, उत्पन्न, वारसाची नोंद, शेतजमिनीचा नकाशा, विभुक्त कुटुंबाचा दाखला, विभक्त कुटुंब दाखला, वंशावळ पंचनामा, नातेसंबंधांचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहीन असल्याचा दाखला, शेतमजुराचा दाखला अशा विविध प्रकारचे दाखले मिळणे बंद झाले आहे. सदरचे दाखले घेण्यासाठी नागरिक तलाठी कार्यालयात गेल्यावर त्यांना स्पष्ष्टपणे नकार दिला जात असून, तहसीलदारांकडून अशाप्रकारचे दाखले देण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सदरचे दाखले कोण देईल व कोठे मिळतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.