शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

दाखले बंद झाल्याने गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:30 IST

अधिकार नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांंकडून दिले जाणारे विविध प्रकारचे शासकीय व कृषी दाखले देण्यास गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होऊ लागली असून, त्याचा फटका शैक्षणिक कारणांसाठी विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण होत असताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहेत.

नाशिक : अधिकार नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून निव्वळ जनतेची गैरसोय टाळण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकाºयांंकडून दिले जाणारे विविध प्रकारचे शासकीय व कृषी दाखले देण्यास गेल्या दहा दिवसांपासून बंद करण्यात आल्याने या दाखल्यांअभावी नागरिकांची शासकीय कामांसाठी गैरसोय होऊ लागली असून, त्याचा फटका शैक्षणिक कारणांसाठी विद्यार्थ्यांना बसू लागला आहे. दाखल्यांसाठी नागरिकांची वणवण होत असताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी मात्र हातावर हात धरून बसले आहेत.दैनंदिन शासकीय कामासाठी लागणारे उत्पन्न, वारस, रहिवास यासह जवळपास वीस प्रकारचे दाखले आजवर तलाठी व मंडळ अधिकाºयांकडून दिले जात होते. परंतु मध्यंतरीच्या काळात काही न्यायिक प्रकरणांमध्ये न्यायालयांनी तलाठी, मंडळ अधिकाºयांना धारेवर धरत नोटिसा काढल्या तसेच शासनालाही नोटिसा बजावून तलाठ्यांना कायदेशीर अधिकार नसताना दाखले देण्याचे कारण काय, अशी विचारणा केली होती. मुळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तलाठ्यांकडून आपल्याच अधिकारात सदरचे दाखले दिले जात असताना त्यातून वाद होऊ लागल्याने तलाठ्यांच्या राज्यस्तरीय संघटनेने २ आॅक्टोबरपासून कोणतेही दाखले देण्यास नकार दिला आहे. तलाठ्यांच्या या कृतीमुळे मात्र सामान्य जनता व विशेष करून शेतकरी वर्गाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. रहिवास, उत्पन्न, वारसाची नोंद, शेतजमिनीचा नकाशा, विभुक्त कुटुंबाचा दाखला, विभक्त कुटुंब दाखला, वंशावळ पंचनामा, नातेसंबंधांचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, भूमिहीन असल्याचा दाखला, शेतमजुराचा दाखला अशा विविध प्रकारचे दाखले मिळणे बंद झाले आहे. सदरचे दाखले घेण्यासाठी नागरिक तलाठी कार्यालयात गेल्यावर त्यांना स्पष्ष्टपणे नकार दिला जात असून, तहसीलदारांकडून अशाप्रकारचे दाखले देण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सदरचे दाखले कोण देईल व कोठे मिळतील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.