शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

वटकपाडा येथील अपूर्ण अवस्थेतील साठवण बंधारा निखळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वटकपाडा येथील अपूर्ण अवस्थेतील साठवण बंधारा निखळल्याने पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या ...

वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वटकपाडा येथील अपूर्ण अवस्थेतील साठवण बंधारा निखळल्याने पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

तालुक्यातील अटकवाडे येथे यंदा साठवण तलावाचे काम करण्यात आले. परंतु हे काम यावर्षी पूर्ण न झाल्याने ते अपूर्ण राहिले. परंतु त्र्यंबकेश्वरसह तालुक्यात संततधार व मुसळधार पाऊस झाल्याने येथील अडविलेल्या नदीस मोठ्या प्रमाणात पूर आला आणि दोन्ही बाजूचे कठडे व बांध भराव पावसामुळे निखळल्याने धरणाच्या खालील बाजूस वटकपाडा येथील शेतकऱ्यांनी लावलेली रोपे त्या मातीच्या भरावाखाली गाडून गेली आहेत. बाकीची रोपे ही पाण्याने वाहून गेली आहेत. सुरुवातीला जमिनीवर लावणी करण्यात आलेली भात, नागली, वरी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी पेरलेल्या उडीदाचे नुकसान झाले आहे. या गावातील शेतकरी हे पूर्णपणे कोरडवाहू शेती करीत असून यापुढे त्यांना त्याच जागेत पुन्हा पिके घेता येणार नाहीत. संतोष गरेल, हरिदास गभाले, भावडू गभाले, रामा गभाले, पांडुरंग गभाले, शंकर गभाले, गोपाळा गभाले, भिका लाखन, हिरामण गरेल व भाऊ तुबडे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले.

नुकसानीस जबाबदार कोण?

वटकपाडा येथील साठवण धरणाचे काम हे मक्तेदार यांनी याचवर्षी जर पूर्ण केले असते तर आमच्या वर्षभराच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले नसते. आता झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने किंवा मक्तेदार यांनी करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. जलपरिषेदेचे अनिल बोरसे व पोपट महाले यांनी संबंधित नुकसानीचे पंचनामे करून या गरीब शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी व संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

--------------------

साठवण बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान (छाया-सुनिल बोडके) (२१ वेळूंजे १/२)

210721\21nsk_4_21072021_13.jpg

२१ वेळूंजे १/२