शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

‘समावेशक’ घोटाळा : शिवसेना देणार ‘सेव्ह पार्किंग’चा लढा; संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्नभूखंड लाटले, मात्र वाहनतळ गायब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:57 IST

 नाशिक : महापालिकेच्या विकास आराखड्यातील वाहनतळासाठी आरक्षित भूखंड मूळमालकाकडून विकसित करण्याच्या योजनेत मोठे भूखंडाचे श्रीखंड काही बिल्डरांनी लाटले आहे. वाहनतळावरील जागांवर व्यापारी संकुले बांधली, परंतु एकतर वाहनतळाच्या जागाच महापालिकेच्या ताब्यात दिल्या नाहीत किंवा त्याचा वापर त्या व्यापारी संकुलांसाठीच होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर कारभाराविरुद्ध आता शिवसेनेने रणश्ािंग फुंकले आहे. संबंधित विकासकांवर ...

ठळक मुद्दे‘समावेशक’ घोटाळा : शिवसेना देणार ‘सेव्ह पार्किंग’चा लढा; संबंधितांवर कारवाईसाठी प्रयत्नभूखंड लाटले, मात्र वाहनतळ गायब!

 

नाशिक : महापालिकेच्या विकास आराखड्यातील वाहनतळासाठी आरक्षित भूखंड मूळमालकाकडून विकसित करण्याच्या योजनेत मोठे भूखंडाचे श्रीखंड काही बिल्डरांनी लाटले आहे. वाहनतळावरील जागांवर व्यापारी संकुले बांधली, परंतु एकतर वाहनतळाच्या जागाच महापालिकेच्या ताब्यात दिल्या नाहीत किंवा त्याचा वापर त्या व्यापारी संकुलांसाठीच होत आहे. त्यामुळे बेकायदेशीर कारभाराविरुद्ध आता शिवसेनेने रणश्ािंग फुंकले आहे. संबंधित विकासकांवर कारवाई करून किमान वाहनतळाच्या जागा तातडीने ताब्यात घ्याव्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.यासंदर्भात शिवसेनेचे पदाधिकारी आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेणार असून, त्याचबरोबर सेव्ह पार्किंग अशी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. शहरात सध्या वाहनतळांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेशा जागा उपलब्ध मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध होत नसल्याने मेकॅनिकल पार्किंग, पझल पार्किंगचा शोध घेतला जात आहे. मात्र स्मार्ट सिटी करीत असताना दुसरीकडे मात्र साधे वाहनतळही उपलब्ध होत नसेल तर काय उपयोग? असा प्रश्न बोरस्ते यांनी केला आहे.शहराच्या अगोदरच्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेली ३३ आरक्षणे वादग्रस्त ठरली होती. आरक्षित जागा मूळमालकाकडून विकसित करून घेऊन ही जागा महापालिकेला विनामूल्य मिळावी यासाठी असलेल्या समावेशक आरक्षण विकासाची तरतूद आहे.२८ पैकी फक्त पाच भूखंडांचे भूसंपादनसध्या महापालिकेच्या विकास आराखड्यातील २८ वाहनतळांच्या आरक्षित भूखंडांपैकी पाचच भूखंडांचे भूसंपादन सुरू असून, उर्वरित भूखंड काही एआर अंंतर्गत तर काही टीडीआरने घेण्यात येत आहेत बहुतांशी भूखंडांचे आरक्षण ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने प्रयत्नही सुरू केलेले नाही. महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये वेगवेगळ्या भूखंडांच्या भूसंपादनासाठी खर्च करण्यात येतात. परंतु वाहनतळासाठी आरक्षित भूखंड का टाळण्यात येतात, असा प्रश्न करण्यात येणार आहे.