शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय नद्याजोड योजनेत देवनदी-एकदरेचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 01:25 IST

नाशिक : गोदावरी तुटीच्या खोऱ्यात तब्बल १२ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी पेठ तालुक्यातील दमनगंगा नदीवर एकदरे येथे ५ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गोदावरी तुटीच्या खोऱ्यात तब्बल १२ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी पेठ तालुक्यातील दमनगंगा नदीवर एकदरे येथे ५ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. आंतरराज्य नदीजोड योजनेत गारगई-वैतरणा-देवनदी व दमणगंगा-एकदरे लिंक योजनेचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने गारगई-वैतरणा-देवनदी प्रकल्पासाठी तसेच दमणगंगा-एकदरे प्रकल्पासाठी ४१ कोटींची तरतूद केली आहे. शासनाने दमणगंगा पिंजाळ योजनेंतर्गत महाराष्ट्र व गुजरातसाठी किती पाणी उपलब्ध होणार आहे, यासाठी नियोजन व जलविज्ञान केंद्राचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली पाच मुख्य अभियंत्यांची समिती गठित केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसारच आता आंतरराज्य नदीजोड योजनेत गारगई-वैतरणा-देवनदी योजनेचा व दमणगंगा-एकदरे लिंक योजनेचा समावेश करण्यात आला असून, देवनदी योजनेसाठी २३ कोटी ९३ लाख तर दमणगंगा-एकदरे लिंक योजनेसाठी १८ कोटींची तरतूद चालू अर्थसंकल्पात धरण्यात आली आहे. या दोन्ही योजनांचा समावेश राष्ट्रीय नद्याजोड योजनेत व्हावा, यासाठी राष्ट्रीय जलविकास अभिकरण संस्थेकडे महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव सादर केला आहे.या प्रकल्पांमुळे उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दमणगंगा पिंजाळ लिंक योजनेच्या मंजुरीतून गुजरातला मोठ्या प्रमाणावर पाणी जात असल्याचा आरोप करीत नाशिकच्या जलचिंतन संस्थेने मुंबईला आझाद मैदानावर उपोषण केले होते. तसेच यासंदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी राज्य शासन व केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी विधानसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित करीत हे पाणी महाराष्ट्रातच ठेवण्याबाबत भूमिका मांडली होती. साडेआठशे कोटींचा प्रकल्पएकदरे येथे प्रस्तावित धरणावर सुमारे ८५० कोटींचा खर्च अपेक्षित असून, सुमारे आठ किलोमीटरचा बोगदा करून एकदरे धरणातून उर्ध्वसिंचनाद्वारे हे पाणी उचलून थेट गंगापूर धरणात टाकण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव व नियोजन जलसंपदा विभागाने सविस्तर अहवालाद्वारे तयार केले आहे.साडेपाच किमीचा बोगदाएकदरे धरणापासून गंगापूर धरणापर्यंत सुमारे साडेआठ किलोमीटरपर्यंत ऊर्ध्वसिंचनाद्वारे पाणी गंगापूर धरणात सोडण्यात येणार आहे. त्यात दिंडोरी तालुक्यातील काही गावांपासून नाशिकच्या गंगापूर धरणापर्यंत सुमारे साडेपाच किलोमीटरचा बोगदा (भुयार) असणार आहे. या बोगद्यातून पाणी थेट गंगापूर धरणात सोडण्यात येईल.