शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या पर्वाचे उद्घाटन

By admin | Updated: November 28, 2014 22:42 IST

अंकुर फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या पर्वाचे उद्घाटन

नाशिक : समाजातील दुर्लक्षित घटक मुख्य प्रवाहात यावेत व समाजालाही त्यांच्या जगण्याची कल्पना यावी, या उद्देशाने काम करीत असलेल्या अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट या सामाजिक संस्थेच्या अंकुर फिल्म फेस्टिव्हल २०१४ चे उद्घाटन झाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचे उद्घाटन मातीमध्ये अंकुराचे बीजारोपण करून करण्यात आले. तसेच कम्युनिटी व्हिडीओने बनविलेल्या बारा माहितीपटांचे अनावरणही यावेळी करण्यात आले. या फेस्टिव्हलचे यंदाचे तिसरे वर्ष होते. याप्रसंगी सत्यमेव जयते या स्टार प्लसवरील कार्यक्रमाचे संयोजक लॅन्सी फर्नांडिस, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे लोकेश शेवडे, हेमंत बेळे, जितेंद्र पगारे, अभिव्यक्ती मीडिया संयोजन समितीचे सदस्य रणजित गाडगीळ आदि उपस्थित होते. उपेक्षित घटकांचे चित्रण व समाजातील अडचणी चांगल्या माहितीपटांच्या आधारे समाजासमोर आणाव्यात, या उद्देशाने २०१० मध्ये अंकुर फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. रविवारपर्यंत (दि. ३०) हा सोहळा कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये होणार आहे. या चार दिवसांत एकूण ८० माहितीपट दाखविले जाणार आहेत. त्यामध्ये महिलांचे समाजातील परिस्थितीचे वास्तव दर्शविणारे, पर्यावरण, प्रदूषण, शाळा अशा विषयांवर माहितीपट दाखविले जाणार आहेत. (प्रतिनिधी)