शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील नागरिकांना  मरणानंतरही नशिबी यातनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:43 IST

नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.

नाशिक : नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.नाशिक तालुक्यातील ओझरखेड, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्वर, गोविंदपूर, गंगाम्हाळुंगी, चांदशी, मनोली, वैष्णववाडी, येºयाचा पाडा, राजेवाडी, गाजरवाडी या आदिवासी गावपाड्यावरील रहिवाशांच्या वैकुंठवारीचा मार्ग खडतर बनला आहे. यातील काही गावांना कित्येक वर्र्षांपूर्वी असलेली स्मशानभूमीची केवळ जागाच शिल्लक राहिली आहे. तेथे अद्याप शेड अथवा बांधकाम करण्यात आलेले नाही तर काही गावांना दुसºया गावातील स्मशासनभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात.आदिवासी भाग असल्यामुळे तेथील रहिवाशांकडून स्मशानभूमीबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नसल्याने अशी कितीतरी गावे स्मशानभूमीपासून वंचितच आहेत. ज्या गावांनी पाठपुरावा केला त्यांच्याही प्रयत्नांना वर्षानुवर्ष यश आलेले नाही. यातून प्रशासकीय उदासीनता समोर येते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तालुक्यातील काही गावांना जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. परंतु निधी प्राप्त नसल्याने ही कामे अद्यापही होऊ शकलेली नाहीत.नाशिक तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्मशानभूमी नसलेल्या अकरा गावांमधील व्यथा जिल्हा परिषदेत मांडली जात असताना जिल्हा परिषद मात्र केवळ नऊ गावेच असल्याचा दावा करीत आहेत. गावे किती आहेत हा तक्रारीचा मुद्दा नाही तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचा आणि जनसुविधेचा असताना अधिकाºयांकडून या प्रकरणी गांभीर्य दाखविले जात नसल्याचे यावरून समोर आले आहे.तालुक्यातील अकरा गावांना स्मशानभूमी नाही. जेथे अंत्यविधी केले जातात त्या जागेला स्मशानभूमी म्हणावे का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांना स्मशानभूमी नाही तेथील लोक मरत नाही का असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय निर्ढावलेपण इतके वाढले आहे की स्मशानभूमी असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीची कामे घेण्यात आलेली नाहीत आणि जेथे स्मशानभूमी आहे तेथे यापूर्वी दहा आणि दुसºयांना पाच लाखांपर्यंत निधी मंजूर केलेला आहे.-हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक