शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

दुर्गम भागातील नागरिकांना  मरणानंतरही नशिबी यातनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:43 IST

नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.

नाशिक : नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.नाशिक तालुक्यातील ओझरखेड, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्वर, गोविंदपूर, गंगाम्हाळुंगी, चांदशी, मनोली, वैष्णववाडी, येºयाचा पाडा, राजेवाडी, गाजरवाडी या आदिवासी गावपाड्यावरील रहिवाशांच्या वैकुंठवारीचा मार्ग खडतर बनला आहे. यातील काही गावांना कित्येक वर्र्षांपूर्वी असलेली स्मशानभूमीची केवळ जागाच शिल्लक राहिली आहे. तेथे अद्याप शेड अथवा बांधकाम करण्यात आलेले नाही तर काही गावांना दुसºया गावातील स्मशासनभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात.आदिवासी भाग असल्यामुळे तेथील रहिवाशांकडून स्मशानभूमीबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नसल्याने अशी कितीतरी गावे स्मशानभूमीपासून वंचितच आहेत. ज्या गावांनी पाठपुरावा केला त्यांच्याही प्रयत्नांना वर्षानुवर्ष यश आलेले नाही. यातून प्रशासकीय उदासीनता समोर येते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तालुक्यातील काही गावांना जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. परंतु निधी प्राप्त नसल्याने ही कामे अद्यापही होऊ शकलेली नाहीत.नाशिक तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्मशानभूमी नसलेल्या अकरा गावांमधील व्यथा जिल्हा परिषदेत मांडली जात असताना जिल्हा परिषद मात्र केवळ नऊ गावेच असल्याचा दावा करीत आहेत. गावे किती आहेत हा तक्रारीचा मुद्दा नाही तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचा आणि जनसुविधेचा असताना अधिकाºयांकडून या प्रकरणी गांभीर्य दाखविले जात नसल्याचे यावरून समोर आले आहे.तालुक्यातील अकरा गावांना स्मशानभूमी नाही. जेथे अंत्यविधी केले जातात त्या जागेला स्मशानभूमी म्हणावे का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांना स्मशानभूमी नाही तेथील लोक मरत नाही का असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय निर्ढावलेपण इतके वाढले आहे की स्मशानभूमी असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीची कामे घेण्यात आलेली नाहीत आणि जेथे स्मशानभूमी आहे तेथे यापूर्वी दहा आणि दुसºयांना पाच लाखांपर्यंत निधी मंजूर केलेला आहे.-हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक