शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील नागरिकांना  मरणानंतरही नशिबी यातनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:43 IST

नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.

नाशिक : नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.नाशिक तालुक्यातील ओझरखेड, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्वर, गोविंदपूर, गंगाम्हाळुंगी, चांदशी, मनोली, वैष्णववाडी, येºयाचा पाडा, राजेवाडी, गाजरवाडी या आदिवासी गावपाड्यावरील रहिवाशांच्या वैकुंठवारीचा मार्ग खडतर बनला आहे. यातील काही गावांना कित्येक वर्र्षांपूर्वी असलेली स्मशानभूमीची केवळ जागाच शिल्लक राहिली आहे. तेथे अद्याप शेड अथवा बांधकाम करण्यात आलेले नाही तर काही गावांना दुसºया गावातील स्मशासनभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात.आदिवासी भाग असल्यामुळे तेथील रहिवाशांकडून स्मशानभूमीबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नसल्याने अशी कितीतरी गावे स्मशानभूमीपासून वंचितच आहेत. ज्या गावांनी पाठपुरावा केला त्यांच्याही प्रयत्नांना वर्षानुवर्ष यश आलेले नाही. यातून प्रशासकीय उदासीनता समोर येते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तालुक्यातील काही गावांना जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. परंतु निधी प्राप्त नसल्याने ही कामे अद्यापही होऊ शकलेली नाहीत.नाशिक तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्मशानभूमी नसलेल्या अकरा गावांमधील व्यथा जिल्हा परिषदेत मांडली जात असताना जिल्हा परिषद मात्र केवळ नऊ गावेच असल्याचा दावा करीत आहेत. गावे किती आहेत हा तक्रारीचा मुद्दा नाही तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचा आणि जनसुविधेचा असताना अधिकाºयांकडून या प्रकरणी गांभीर्य दाखविले जात नसल्याचे यावरून समोर आले आहे.तालुक्यातील अकरा गावांना स्मशानभूमी नाही. जेथे अंत्यविधी केले जातात त्या जागेला स्मशानभूमी म्हणावे का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांना स्मशानभूमी नाही तेथील लोक मरत नाही का असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय निर्ढावलेपण इतके वाढले आहे की स्मशानभूमी असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीची कामे घेण्यात आलेली नाहीत आणि जेथे स्मशानभूमी आहे तेथे यापूर्वी दहा आणि दुसºयांना पाच लाखांपर्यंत निधी मंजूर केलेला आहे.-हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक