शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दुर्गम भागातील नागरिकांना  मरणानंतरही नशिबी यातनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:43 IST

नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.

नाशिक : नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.नाशिक तालुक्यातील ओझरखेड, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्वर, गोविंदपूर, गंगाम्हाळुंगी, चांदशी, मनोली, वैष्णववाडी, येºयाचा पाडा, राजेवाडी, गाजरवाडी या आदिवासी गावपाड्यावरील रहिवाशांच्या वैकुंठवारीचा मार्ग खडतर बनला आहे. यातील काही गावांना कित्येक वर्र्षांपूर्वी असलेली स्मशानभूमीची केवळ जागाच शिल्लक राहिली आहे. तेथे अद्याप शेड अथवा बांधकाम करण्यात आलेले नाही तर काही गावांना दुसºया गावातील स्मशासनभूमीत अंत्यसंस्कार करावे लागतात.आदिवासी भाग असल्यामुळे तेथील रहिवाशांकडून स्मशानभूमीबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नसल्याने अशी कितीतरी गावे स्मशानभूमीपासून वंचितच आहेत. ज्या गावांनी पाठपुरावा केला त्यांच्याही प्रयत्नांना वर्षानुवर्ष यश आलेले नाही. यातून प्रशासकीय उदासीनता समोर येते. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात तालुक्यातील काही गावांना जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीच्या कामांना मंजुरी मिळालेली आहे. परंतु निधी प्राप्त नसल्याने ही कामे अद्यापही होऊ शकलेली नाहीत.नाशिक तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्मशानभूमी नसलेल्या अकरा गावांमधील व्यथा जिल्हा परिषदेत मांडली जात असताना जिल्हा परिषद मात्र केवळ नऊ गावेच असल्याचा दावा करीत आहेत. गावे किती आहेत हा तक्रारीचा मुद्दा नाही तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचा आणि जनसुविधेचा असताना अधिकाºयांकडून या प्रकरणी गांभीर्य दाखविले जात नसल्याचे यावरून समोर आले आहे.तालुक्यातील अकरा गावांना स्मशानभूमी नाही. जेथे अंत्यविधी केले जातात त्या जागेला स्मशानभूमी म्हणावे का? असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. ज्या गावांना स्मशानभूमी नाही तेथील लोक मरत नाही का असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय निर्ढावलेपण इतके वाढले आहे की स्मशानभूमी असलेल्या गावांमध्ये स्मशानभूमीची कामे घेण्यात आलेली नाहीत आणि जेथे स्मशानभूमी आहे तेथे यापूर्वी दहा आणि दुसºयांना पाच लाखांपर्यंत निधी मंजूर केलेला आहे.-हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदNashikनाशिक