शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नाशिकमध्ये १०५ तहसिलदार अन् ५८५ नायब तहसिलदारांनी पुकारले ‘काम बंद’ आंदोलन

By अझहर शेख | Updated: April 3, 2023 17:40 IST

नायब तहसिलदारांना सरकारने राजपत्रित वर्ग-२चे वेतन द्यावे यासाठी ग्रेड पे वाढीची मागणी मान्य होत नसल्यामुळे राज्यातील महसुल विभागातील या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.३) बेमूदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

नाशिक :

नायब तहसिलदारांना सरकारने राजपत्रित वर्ग-२चे वेतन द्यावे यासाठी ग्रेड पे वाढीची मागणी मान्य होत नसल्यामुळे राज्यातील महसुल विभागातील या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून (दि.३) बेमूदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील १०५ तहसिलदार व ५८५ नायब तहसिलदारांनी बंदमध्ये सहभागी होत काम बंद ठेवणे पसंत केले. यामुळे जिल्ह्यातील महसुल प्रशासनाचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाल्याचे दिसून आले.

राज्याती महसुल विभागातील नायब तहसिलदार, राजपत्रित वर्ग-२ हे पद महत्वाचे आहे. या पदावरील अधिकाऱ्यांना वर्ग-२नुसार अजूनही वेतन दिले जात नाही. यासाठी १९९८सालापासून सरकारकडे राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटना पाठपुरावा करत आहे. मात्र तरीही सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने अखेर संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन पुकारत संप केला. नायब तहसिलदारांचे ग्रेड पे ४८०० रूपये करण्यात यावे, यासाठी शासनाला यापुर्वी बेमुदत बंद पुकारण्यात येईल, अशी नोटिस दिली गेली होती, असा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे. तत्काली अपर मुख्य सचिवांनी घेतलेल्या तेव्हाच्या बैठकीत आश्वासन दिले गेले होते; मात्र तोडगा निघू शकलेला नाही. के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या वेतन त्रुटी समिती समक्ष नायब तहसिलदार यांचे ग्रेड पे ४,८००रूपये इतके करण्याचे सादरीकरण करण्यात आले होते, असे अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मनोहर पोटे, बाळासाहेब वाकचौरे, सुरेश बगळे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कार्यालयाच्या आवारात निदर्शनेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सोमवारी सकाळी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तहसिलदार व नायब तहसिलदारांनी एकत्र येत ग्रे-पे वाढीची मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी या मागणीचे फलकदेखील झळकाविण्यात आले. या निदर्शनात महिला व पुरूष अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.