शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

म्हाळदे वीज उपकेंद्रात अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 01:15 IST

मालेगाव शहरालगतच्या म्हाळदे, सवंदगाव, सायने, गिगाव, म्हालणगाव शिवारात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. वीज वितरण कंपनीकडे वारंवार वीजपुरवठ्याची मागणी करूनही दखल घेतली गेली नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हाळदे उपकेंद्रातील उपअभियंता राजेश शिवगण व वीज कर्मचाऱ्यांना उपकेंद्रात डांबले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

मालेगाव : शहरालगतच्या म्हाळदे, सवंदगाव, सायने, गिगाव, म्हालणगाव शिवारात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. वीज वितरण कंपनीकडे वारंवार वीजपुरवठ्याची मागणी करूनही दखल घेतली गेली नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हाळदे उपकेंद्रातील उपअभियंता राजेश शिवगण व वीज कर्मचाऱ्यांना उपकेंद्रात डांबले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सवंदगाव, म्हाळदे, सायने, गिगाव, म्हालणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता. या भागातील व्यावसायिकांना सुरळीत वीज पुरवठा केला जातो ; मात्र शेतीसाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्यात भेदभाव केला जातो. परिणामी लागवड केलेल्या कांदे व फळ पिकांच्या पाण्याअभावी नुकसान होत आहे. कांदे करपू लागले आहेत. वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती ; मात्र कंपनीकडून दखल घेण्यात आली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी उपअभियंता शिवगण यांना जाब विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपअभियंता शिवगण व कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास वीज उपकेंद्राच्या कार्यालयात डांबून ठेवले होते. या आंदोलनाची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. शेतकरी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची मध्यस्थी केली ; मात्र संतप्त शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते.

आंदोलनस्थळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी धाव घेत परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. विजेच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सचिन शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, दिलीप अहिरे, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, दीपक बच्छाव, आप्पा शेवाळे, प्रवीण शेवाळे, दादा शेवाळे आदींसह शेतकरी, वीज ग्राहक सहभागी झाले होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवelectricityवीजFarmerशेतकरी