शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

म्हाळदे वीज उपकेंद्रात अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना कार्यालयात डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 01:15 IST

मालेगाव शहरालगतच्या म्हाळदे, सवंदगाव, सायने, गिगाव, म्हालणगाव शिवारात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. वीज वितरण कंपनीकडे वारंवार वीजपुरवठ्याची मागणी करूनही दखल घेतली गेली नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हाळदे उपकेंद्रातील उपअभियंता राजेश शिवगण व वीज कर्मचाऱ्यांना उपकेंद्रात डांबले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी आक्रमक : लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

मालेगाव : शहरालगतच्या म्हाळदे, सवंदगाव, सायने, गिगाव, म्हालणगाव शिवारात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी भरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. वीज वितरण कंपनीकडे वारंवार वीजपुरवठ्याची मागणी करूनही दखल घेतली गेली नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी म्हाळदे उपकेंद्रातील उपअभियंता राजेश शिवगण व वीज कर्मचाऱ्यांना उपकेंद्रात डांबले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता जे. के. भामरे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सवंदगाव, म्हाळदे, सायने, गिगाव, म्हालणगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार सुरू होता. या भागातील व्यावसायिकांना सुरळीत वीज पुरवठा केला जातो ; मात्र शेतीसाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्यात भेदभाव केला जातो. परिणामी लागवड केलेल्या कांदे व फळ पिकांच्या पाण्याअभावी नुकसान होत आहे. कांदे करपू लागले आहेत. वीज वितरण कंपनीने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती ; मात्र कंपनीकडून दखल घेण्यात आली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी उपअभियंता शिवगण यांना जाब विचारला असता त्यांनी शेतकऱ्यांशी अरेरावीची भाषा केली. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी उपअभियंता शिवगण व कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास वीज उपकेंद्राच्या कार्यालयात डांबून ठेवले होते. या आंदोलनाची माहिती पवारवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. शेतकरी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची मध्यस्थी केली ; मात्र संतप्त शेतकरी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम होते.

आंदोलनस्थळी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भामरे यांनी धाव घेत परिसरात वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल. विजेच्या समस्येवर तोडगा काढला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सचिन शेवाळे, लक्ष्मण शेवाळे, दिलीप अहिरे, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, दीपक बच्छाव, आप्पा शेवाळे, प्रवीण शेवाळे, दादा शेवाळे आदींसह शेतकरी, वीज ग्राहक सहभागी झाले होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवelectricityवीजFarmerशेतकरी