शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

टोमॅटोच्या भावात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 00:44 IST

नवीन वर्षाच्या प्रारंभीपासूनच टोमॅटो मालाचा हंगाम संपल्याने व थंडीमुळे आवक काही प्रमाणात घटल्याने बाजार वाढले आहेत.

पंचवटी : गेल्या वर्षी टोमॅटो मालाची प्रचंड लागवड झाल्याने बाजारभाव पूर्णपणे घसरले होते. लागवड तसेच उत्पादन खर्चदेखील सुटत नसल्याने व त्यातच कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील टोमॅटो लागवड करणाऱ्या शेतकºयांनी टोमॅटोचा खुडा बंद केला होता तर काहींनी शेतातील उभ्या पिकाकडे दुर्लक्ष करून टोमॅटो जनावरांना सोडून दिला होता. मात्र नवीन वर्षाच्या प्रारंभीपासूनच टोमॅटो मालाचा हंगाम संपल्याने व थंडीमुळे आवक काही प्रमाणात घटल्याने बाजार वाढले आहेत.गेल्यावर्षी तीन ते चार रुपये प्रतिकिलो दराने विक्री होणाºया टोमॅटो मालाला शेतकºयांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या मालाला १५ रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या आठवडाभरापासून बाजारभावात तेजी निर्माण झाली आहे.नाशिकच्या बाजार समितीतून मुंबई शहर तसेच डहाणू व पालघर या उपनगरात निर्यात केली जात आहे. गुजरात राज्यात सध्या स्थानिक शेतमालाची आवक सुरू झाल्याने गुजरातला नाशिकमधून टोमॅटो मालाची निर्यात बंदच आहे. जुलै ते सप्टेंबर हा टोमॅटो उत्पादनाचा हंगाम असून गेल्यावर्षी याच कालावधीत टोमॅटो मालाची प्रचंड उत्पादन वाढल्याने त्यातच पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने बाजारभाव ४ रुपये किलोपर्यंत कोलमडले होते. उत्पादन तसेच लागवड खर्च न सुटल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त करून शेतातील उभ्या टोमॅटोच्या पिकाकडे पाठ फिरविली होती. सध्या हिवाळा सुरू असल्याने तसेच अनेक शेतकºयांनी बाजारभाव नसल्याने यापूर्वीच टोमॅटो पीक काढून टाकल्याने आवक घटली आहे. सध्या बाजारात नवीन टोमॅटो माल विक्रीसाठी दाखल होत असल्याने व आवक कमी असल्याने बाजारभाव तेजीत आले आहेत. टोमॅटोच्या २० किलो वजनी प्रति जाळीला ३०० रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत असल्याने या बाजारभावामुळे शेतकºयांनी तूर्तास समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी