शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

टमाटा भावात सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 18:41 IST

गेल्या काही दिवसात टमाट्याच्या घसरलेल्या भावामुळे चिंताक्रांत झालेल्या उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागला असून, बांगलादेश व दुबई या ठिकाणी टमाटा निर्यात होऊ लागल्याने भावात सुधारणा झाली आहे. मात्र पाकिस्तानात टमाट्यासाठी निर्यात खुली होण्याच्या प्रक्रि येची प्रतीक्षा उत्पादक करीत आहेत.

ठळक मुद्देआशा पल्लवित : दुबई, बांगलादेशात निर्यात

वणी : गेल्या काही दिवसात टमाट्याच्या घसरलेल्या भावामुळे चिंताक्रांत झालेल्या उत्पादकांना आशेचा किरण दिसू लागला असून, बांगलादेश व दुबई या ठिकाणी टमाटा निर्यात होऊ लागल्याने भावात सुधारणा झाली आहे. मात्र पाकिस्तानात टमाट्यासाठी निर्यात खुली होण्याच्या प्रक्रि येची प्रतीक्षा उत्पादक करीत आहेत.दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टमाटा लागवड करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी खुडणी सुरू आहे, तर काही भागात येत्या पंधरवड्यात मोठ्या प्रमाणावर टमाटा बाजारात येण्याच्या स्थितीत आहे. मागील वर्षी टमाटा उत्पादकांना चांगला व समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षी त्याअनुषंगाने मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आलेली आहे.दरम्यान आठवडाभरापूर्वी मातीमोल भावाने टमाटा विक्र ी करण्याची वेळ उत्पादकांवर आली. काहींनी रस्त्यावर टमाटे फेकले तर काहींनी गुरांना खाण्यास टाकले. उत्पादन खर्च तर लांबच राहिला, खुडणी व वाहतुकीचा खर्चही निघेनासा झाला. त्यामुळे टमाटा उत्पादक हतबल झाले.लागवड ते उत्पादन खर्चाचा ताळमेळही जमेनासा झाला. प्रसंगी काही उत्पादकांनी हातउसनवार कर्ज काढून टमाटा शेती फुलविली. पुढील नियोजन आखण्यात आले; मात्र घसरलेल्या भावामुळे मागणी नाही, अशी स्थिती निर्माण झाली. दरम्यान बांगलादेश व दुबईत सध्या नाशिक जिल्ह्यातील टमाटा विक्र ीसाठी जात असल्याची माहिती टमाटा निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली आहे.शंभर ते दीडशे ट्रक टमाटा प्रतिदिन सध्या विक्र ीसाठी देशांतर्गत जात आहे. सध्या दहा ते बारा कंटेनर टमाटा दुबई व बांगलादेशात निर्यात होत असून, एका कंटेनरमध्ये वीस टन टमाटा वाहतूक क्षमता असते. निर्यातक्षम टमाटा २०० ते २५० रुपये तर स्थानिक घाऊक बाजारात प्रतवारी दर्जा मागणीनुसार १०० ते २०० रु पये वीस किलो जाळीचा भाव असल्याची माहिती उंबरे यांनी दिली. दरम्यान टमाटा भाववाढीचा वेग अपेक्षित नसला तरी सद्य:स्थितीतील भाववाढ उत्पादकांना थोड्या अंशी दिलासादायक ठरली आहे.तर उत्पादकांना अच्छे दिन!येत्या काळात भावात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान पाकिस्तानमध्ये भारतीय टमाट्याला निर्यातीच्या माध्यमातून प्रवेश मिळाला तर उत्पादकांना अच्छे दिन येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रNashikनाशिक