शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

कृषी क्षेत्रातील अत्यंत  महत्त्वाच्या मुद्द्यांनाच बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

या अर्थसंकल्पात आपण ९१ साली स्वीकारलेल्या उदारीकरणाचा (सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण) राहिलेला काही भाग व समाजवादी धोरणांतील कल्याणकारी योजना (उज्ज्वला व काही भिकवादी योजना) यांची सरमिसळ करत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे.

या अर्थसंकल्पात आपण ९१ साली स्वीकारलेल्या उदारीकरणाचा (सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण) राहिलेला काही भाग व समाजवादी धोरणांतील कल्याणकारी योजना (उज्ज्वला व काही भिकवादी योजना) यांची सरमिसळ करत हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. सरकार म्हणून या अर्थसंकल्पाला काहीएक विशिष्ट तत्त्वज्ञान वा दिशा आहे तसे दिसत नाही. नाही तरी अर्थसंकल्पांची भाषा काहीही असली तरी शेवटी ते कसे राबविले जाते याबद्दलची आपल्याकडे यंत्रणा नसल्याने अर्थसंकल्पाच्या गोड गोड भाषेवरच अर्थसंकल्प साजरा करावा लागतो. शेतकऱ्यांबद्दल अनेक योजना वा तरतुदी या अर्थसंकल्पात असल्या तरी मुळात शेतकरी हा देशातला एक उत्पादक वर्ग आहे असे न समजता त्याला गाव, गरिबीच्या पातळीवर आणून मदतपात्र ठरवले आहे. शेतीची प्रमुख अंगे म्हणजे उत्पादन, व्यापार, तंत्रज्ञान व निर्यात याबद्दल चकार शब्द ही न काढता शेतकरी उत्पादक गट वा संस्था तयार करणार असे सांगण्यात आले आहे. चौदापासून प्रत्येक अर्थसंकल्पात स्थान असलेला देशात मुक्त एकल बाजारासाठी काही तरी तरतूद असे त्याचा यात साधा उल्लेखही नाही. किमान हमी दर देता यावा म्हणून बाजार स्थिरीकरण निधी तोही कुठे दिसत नाही. बाजार समित्यांमध्ये अनेक सुधार अपेक्षित आहेत त्याबद्दल ही सुतोवाच नाही. म्हणजे शेतमालाला रास्त भाव मिळावा, त्यावरच्या प्रक्रिया उद्योगाबाबत वा सुधारित निर्यात धोरणांबद्दलही काही योजना नाहीत. एकंदरीत हा अर्थसंकल्प हा कृषी क्षेत्राची निराशा करणारा दिसतो.देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करणे शेतीतून शक्य नाही़ औद्योगिक क्षेत्र अपयशी ठरल्याने केवळ सेवा क्षेत्रावर एवढी जबाबदारी टाकणार असे दिसते. शेतीतील गुंतवणूक, बाजार सुधार, साठवणूक, प्रक्रि या, निर्यात याबद्दल काही एक न करता सरकार आपली ही उद्दिष्ट कशी साध्य करेल, असा प्रश्न निर्माण करणारा हा अर्थसंकल्प आहे असे म्हणावे लागेल़  - गिरीधर पाटील, कृषी अर्थतज्ज्ञ

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019Agriculture Sectorशेती क्षेत्र