शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कारभारी परिचय धोरण राबवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:54 IST

नाशिक : सरपंचांना अनेक अडचणी असतात; परंतु त्यांनी त्यावर मात करून पुढे जायचे असते. त्यांना संघटनात्मक काम उभे करायचे आहे. सरपंचांचे प्रश्न मांडणारी ताकदवान अशी संघटना नाही. त्यामुळे सरपंचांनी गावच्या गरजा ओळखून काम केले पाहिजे. सरपंचांसाठी कारभारी परिचय धोरण राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांनी बोलताना केले.

ठळक मुद्देअर्चना जतकर : सरपंचांच्या जबाबदाऱ्यांवर केले विवेचन

नाशिक : सरपंचांना अनेक अडचणी असतात; परंतु त्यांनी त्यावर मात करून पुढे जायचे असते. त्यांना संघटनात्मक काम उभे करायचे आहे. सरपंचांचे प्रश्न मांडणारी ताकदवान अशी संघटना नाही. त्यामुळे सरपंचांनी गावच्या गरजा ओळखून काम केले पाहिजे. सरपंचांसाठी कारभारी परिचय धोरण राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महिलाराज सत्ता आंदोलनाच्या अमरावती विभागीय समन्वयक आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या माजी सरपंच अर्चना जतकर यांनी बोलताना केले.सरपंचांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे हक्क याबाबत विवेचन करताना जतकर म्हणाल्या, अनेक सरपंचांना त्यांच्या कारभाराची माहिती नसते. अंदाजपत्रक कसे बनवावे, हे माहिती नसते. त्यासाठी सरपंचांनी सजग राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.सरपंचांना हवे प्रशिक्षणसरपंचांना निवडून आल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र, ओळखपत्र मिळाले पाहिजे. त्यांचा शपथविधी झाला पाहिजे. सरपंच झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे; परंतु आपण केवळ अनुभवावरच शिकत पुढे जात असतो. आजही अनेक गावात ग्रामसेवकराज आहे. अनेक महिला सरपंचांनी चांगले काम करून दाखविले आहे. शिक्षण नसतानाही त्यांनी गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरपंच प्रतिनिधी म्हणून एकही आमदार नाही. दुखणे आपले असते; परंतु मांडणारे दुसरेच असतात. सरपंचांना तुटपुंजे मानधन मिळते. त्यांना मीटिंग भत्ता वेळेवर मिळत नाही. त्यांना आपल्या प्रश्नांसाठीच झगडावे लागते, असे सांगत जतकर यांनी सरपंचांना व्यासपीठ मिळवून देणाºया लोकमतचे कौतुक केले.