शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

कृषी आमदनी विमा योजना कार्यान्वित करणार

By admin | Updated: March 22, 2015 00:30 IST

राधामोहन सिंह : गारपीटग्रस्त भागांची केली पहाणी

 

लासलगाव : गारपिटीने व वादळी पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून, नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी आणि गारपीटग्रस्तांचे पंचनामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊन येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम तातडीने जमा केली जाईल व शेतकऱ्यांसाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी केली.शनिवारी दुपारी राधामोहन सिंह यांनी निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द, वनसगाव, उगाव या गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.सिंह यांनी गारपीट हा चिंतेचा विषय असून, महाराष्ट्रात खासकरून नाशिक जिल्ह्यातील खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांनी लोकसभेत हा प्रश्न गांभीर्याने मांडल्याने मी नाशिक येथे पाहणी करण्यासाठी आलो असून, कृषी खात्याचे दोन्ही राज्यमंत्री हे राजस्थान व उत्तर प्रदेशच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या अनेक विमा योजना आहेत; मात्र या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे . येत्या एप्रिलपासून शेतकरींचे हित जोपासण्यासाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. केंद्र सरकारने हातात कारभार घेऊन केवळ नऊ महिने झाले असून, अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या असल्याने शेतकऱ्यांनाही भरघोस मदत देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.पाहणी दौऱ्यात राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, आमदार अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप, सुरेशबाबा पाटील, दिलीप बनकर आदि उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्ज माफी, वीजबिल माफी, शासकीय कर, शैक्षणिक फी माफीची मागणी सिंग यांच्याकडे केली. निफाडचे आमदार अनिल कदम यांनी मतदारसंघातील शेतकऱ्याच्या व्यथा तीव्र असून, ते चालू अधिवेशनामध्ये सरकारच्या निदर्शनास आणून दिले असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वाढीव बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घालून शासनाकडे मागणी केली जाईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)