शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

कृषी आमदनी विमा योजना कार्यान्वित करणार

By admin | Updated: March 22, 2015 00:30 IST

राधामोहन सिंह : गारपीटग्रस्त भागांची केली पहाणी

 

लासलगाव : गारपिटीने व वादळी पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून, नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी आणि गारपीटग्रस्तांचे पंचनामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊन येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम तातडीने जमा केली जाईल व शेतकऱ्यांसाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी केली.शनिवारी दुपारी राधामोहन सिंह यांनी निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द, वनसगाव, उगाव या गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.सिंह यांनी गारपीट हा चिंतेचा विषय असून, महाराष्ट्रात खासकरून नाशिक जिल्ह्यातील खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांनी लोकसभेत हा प्रश्न गांभीर्याने मांडल्याने मी नाशिक येथे पाहणी करण्यासाठी आलो असून, कृषी खात्याचे दोन्ही राज्यमंत्री हे राजस्थान व उत्तर प्रदेशच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या अनेक विमा योजना आहेत; मात्र या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे . येत्या एप्रिलपासून शेतकरींचे हित जोपासण्यासाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. केंद्र सरकारने हातात कारभार घेऊन केवळ नऊ महिने झाले असून, अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या असल्याने शेतकऱ्यांनाही भरघोस मदत देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.पाहणी दौऱ्यात राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, आमदार अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप, सुरेशबाबा पाटील, दिलीप बनकर आदि उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्ज माफी, वीजबिल माफी, शासकीय कर, शैक्षणिक फी माफीची मागणी सिंग यांच्याकडे केली. निफाडचे आमदार अनिल कदम यांनी मतदारसंघातील शेतकऱ्याच्या व्यथा तीव्र असून, ते चालू अधिवेशनामध्ये सरकारच्या निदर्शनास आणून दिले असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वाढीव बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घालून शासनाकडे मागणी केली जाईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)