शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

कृषी आमदनी विमा योजना कार्यान्वित करणार

By admin | Updated: March 22, 2015 00:30 IST

राधामोहन सिंह : गारपीटग्रस्त भागांची केली पहाणी

 

लासलगाव : गारपिटीने व वादळी पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले असून, नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी आणि गारपीटग्रस्तांचे पंचनामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण होऊन येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम तातडीने जमा केली जाईल व शेतकऱ्यांसाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शनिवारी केली.शनिवारी दुपारी राधामोहन सिंह यांनी निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द, वनसगाव, उगाव या गारपीटग्रस्त गावांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.सिंह यांनी गारपीट हा चिंतेचा विषय असून, महाराष्ट्रात खासकरून नाशिक जिल्ह्यातील खासदार हरिश्चंद्र चव्हाण व हेमंत गोडसे यांनी लोकसभेत हा प्रश्न गांभीर्याने मांडल्याने मी नाशिक येथे पाहणी करण्यासाठी आलो असून, कृषी खात्याचे दोन्ही राज्यमंत्री हे राजस्थान व उत्तर प्रदेशच्या गारपीटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या अनेक विमा योजना आहेत; मात्र या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे . येत्या एप्रिलपासून शेतकरींचे हित जोपासण्यासाठी कृषी आमदनी विमा योजना आणणार असल्याचे सिंह यांनी सांगितले. केंद्र सरकारने हातात कारभार घेऊन केवळ नऊ महिने झाले असून, अनेक लोकोपयोगी योजना राबविल्या असल्याने शेतकऱ्यांनाही भरघोस मदत देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.पाहणी दौऱ्यात राज्याचे कृषिमंत्री एकनाथ खडसे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, आमदार अनिल कदम, आमदार बाळासाहेब सानप, सुरेशबाबा पाटील, दिलीप बनकर आदि उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी कर्ज माफी, वीजबिल माफी, शासकीय कर, शैक्षणिक फी माफीची मागणी सिंग यांच्याकडे केली. निफाडचे आमदार अनिल कदम यांनी मतदारसंघातील शेतकऱ्याच्या व्यथा तीव्र असून, ते चालू अधिवेशनामध्ये सरकारच्या निदर्शनास आणून दिले असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि वाढीव बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घालून शासनाकडे मागणी केली जाईल, असे ते म्हणाले. (वार्ताहर)