शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

‘निसर्ग’ वादळाचा शहरासह जिल्ह्यात प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 18:41 IST

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात संध्याकाळनंतर ...

ठळक मुद्देसंध्याकाळपर्यंत वा-याच्या वेगात वाढजिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल सज्ज ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले

नाशिक : मुंबईकडून ‘निसर्ग’ चक्रीवादळाने आता उत्तर महाराष्टÑाकडे आगेकुच सुरू केली आहे. ठाणे जिल्ह्यामार्गे हे वादळ नाशिक जिल्ह्यात संध्याकाळनंतर धडकणार आहे. सध्या नाशिकच्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात चक्रीवादळाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. शहरात वादळाचा फारसा परिणाम जाणवत नसला तरीदेखील पावसाच्या सरी दिवसभर कोसळत असून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत १७ मि.मी इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद हवामान निरिक्षण केंद्राकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात वाऱ्याचा वेग दूपारच्या तुलनेत आता वाढलेला दिसून येत असून ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले आहे.शहरात आज दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या सरींचा वर्षाव सुरूच आहे. पहाटेपासून दूपारपर्यंत वारे ताशी १५ ते २० किमी वेगाने वाहत होते. हळुहळु संध्याकाळपर्यंत वा-याच्या वेगात वाढ होत गेली.दिवसभरात पावसाने शहरात चांगलीच हजेरी लावली. वा-याचा वेग कमी-अधिक होत होता. अग्निशमन दलाच्या जवानांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाचे मुख्यालय तसेच सर्व उपकेंद्रांवर जवान आवश्यक त्या साधनसामुग्रीने सज्ज आहेत. दिवसभरात किरकोळ अपघाताच्या घटना शहरात घडल्याचे अग्निशमन दलाच्या सुत्रांनी सांगितले. दरम्यान, नाशिक कडे संध्याकाळी वादळाने आपली दिशा केल्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या इशारा देण्यात आला.काठे गल्लीतील गणेशनगर उद्यानासमोरील मोठा बॉटल पाम वृक्ष कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी काठेगल्लीत पोहचून वृक्षाच्या फांद्या कापून रस्ता मोकळा केला. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. वाºयाचा वेग संध्याकाळनंतर वाढल्याने झाडांच्या फांद्या तुटून पडण्यास शहरात सुरूवात झाली आहे. शहरात परदेशी प्रजातीची ठिसूळ वृक्षांची संख्या मोठी असल्याने वादळाचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर सोसाट्याचा वारा शहरात वाहू शकतो आणि या वादळी वाºयाने अशी ठिसूळ झाडे मोठ्या संख्येने उन्मळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरम्यान, शहरातील विविध भागांमध्ये आज दिवसभर वीजेचा लपंडाव सुरू होता. काही भागांमध्ये वीजतारांचे घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने वीजपुरवठा खंडीत झाला तर कोठे झाडांच्या फांद्या तुटून विजवाहिन्यांवर आल्याने वीजपुरवठा बाधित झाला. काही उपनगरांमध्ये दोन ते तीन तास तर काही भागांमध्ये तासभर वीज गायब राहिली. महावितरण कंपनीच्या वायरमन कर्मचाऱ्यांनी भर पावसात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावून चोख कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दल