शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खत भाववाढीचा उत्पादन खर्चावर परिणाम; शेतकरी चिंतातूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:06 IST

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

ठळक मुद्दे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रासायनिक खतांच्या भाववाढीचा दुष्परिणाम उत्पादन खर्चावर पडणार असल्याने दुष्काळात तेराव्या महिना, अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.बॅगमागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने अतिरिक्त कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहे.

मालेगाव - खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रासायनिक खतांच्या भाववाढीचा दुष्परिणाम उत्पादन खर्चावर पडणार असल्याने दुष्काळात तेराव्या महिना, अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

तालुक्यात यावर्षी दुष्काळाच्या सावटाने शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतमालाच्या किमती स्थिर आहे, मात्र शेतीला लागणारा निविष्ठांचा किमती झपाट्याने वाढल्याने उत्पादन खर्चात कमालीची वाढ होणार आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्याकरिता रासायनिक खतांवर सबसिडी दिली जाते. ही सबसिडी कोट्यवधीच्या घरात असली तरी दरवर्षी खतांचा किमती वाढतच असल्याने खर्चात वाढ होऊन नफा घटत आहे.

खतविक्रीतून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधीची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पाँस मशीनच्या प्रयोग राबविला गेला. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सबसिडी चोरीला आळा बसला, पण दुसरीकडे खतांचे भाव वाढविण्यात आले, असे शेतकरी सांगतात. शेतमालाचे दर जैसेथे तैसच आहे. इतकेच नव्हे तर काही धान्याच्या किमती खाली घसरल्या आहेत. मात्र बियाणे, खत, मजुरी आणि विजेचा दरात वाढ होतच आहे. यामुळे शेतकऱ्याची कोंडी आणि व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे. युरिया वगळता इतर सर्व अनुदानित खतांचा किमतीत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी शेतीत होणारे नुकसान भरून काढता काढता नाकीनऊ आलेल्या शेतकरावर यंदाही अर्थिक भुर्दंड पडणार आहे. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. एकरी एक ते दोन रासायनिक खतांच्या बँग शेतकरी वापरतात. साधारणत: एका बॅगमागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने अतिरिक्त कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहे.अशा वधारल्या खताच्या किंमती

खरीप हंगामापुर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत १०० ते २५० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. १०.२६.२६ या खंताची ५० किलोची बॅग १२३५ रूपायांपर्यत मिळायाची, ती आता १३४० रुपये किमतीत घ्यावी लागणार आहे. जवळपास १०५ रुपये अतिरिक्त शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहेत. डिएपीची बँग १२९० रुपयाऐवजी १४०० रुपये किंमत झाल्याने ११० रुपयाने भाव वाढले आहेत.  तर पोटॅशची बॅग ७०० रुपयावरुन थेट ९०० रुपये किमतीवर गेली आहे. अन्य खतांच्या किमतीतही १०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMalegaonमालेगांव