शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

खत भाववाढीचा उत्पादन खर्चावर परिणाम; शेतकरी चिंतातूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 17:06 IST

खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

ठळक मुद्दे खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रासायनिक खतांच्या भाववाढीचा दुष्परिणाम उत्पादन खर्चावर पडणार असल्याने दुष्काळात तेराव्या महिना, अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.बॅगमागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने अतिरिक्त कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहे.

मालेगाव - खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यांनी वाढ केल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. रासायनिक खतांच्या भाववाढीचा दुष्परिणाम उत्पादन खर्चावर पडणार असल्याने दुष्काळात तेराव्या महिना, अशीच काहीशी अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

तालुक्यात यावर्षी दुष्काळाच्या सावटाने शेतीच्या उत्पादनात घट झाली आहे. शेतमालाच्या किमती स्थिर आहे, मात्र शेतीला लागणारा निविष्ठांचा किमती झपाट्याने वाढल्याने उत्पादन खर्चात कमालीची वाढ होणार आहे. शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्च नियंत्रित करण्यासोबतच जागतिक स्पर्धेत टिकण्याकरिता रासायनिक खतांवर सबसिडी दिली जाते. ही सबसिडी कोट्यवधीच्या घरात असली तरी दरवर्षी खतांचा किमती वाढतच असल्याने खर्चात वाढ होऊन नफा घटत आहे.

खतविक्रीतून कंपन्या शेतकऱ्यांच्या नावावर कोट्यवधीची सबसिडी लाटतात. त्यामुळे खत विक्रीसाठी पाँस मशीनच्या प्रयोग राबविला गेला. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी केल्यानंतरच खतावरील अनुदान कंपनीला मिळणार आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा सबसिडी चोरीला आळा बसला, पण दुसरीकडे खतांचे भाव वाढविण्यात आले, असे शेतकरी सांगतात. शेतमालाचे दर जैसेथे तैसच आहे. इतकेच नव्हे तर काही धान्याच्या किमती खाली घसरल्या आहेत. मात्र बियाणे, खत, मजुरी आणि विजेचा दरात वाढ होतच आहे. यामुळे शेतकऱ्याची कोंडी आणि व्यापाऱ्यांची चांदी होणार आहे. युरिया वगळता इतर सर्व अनुदानित खतांचा किमतीत वाढ करण्यात आली आहे. दरवर्षी शेतीत होणारे नुकसान भरून काढता काढता नाकीनऊ आलेल्या शेतकरावर यंदाही अर्थिक भुर्दंड पडणार आहे. तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनचे मोठे क्षेत्र आहे. एकरी एक ते दोन रासायनिक खतांच्या बँग शेतकरी वापरतात. साधारणत: एका बॅगमागे १०० ते २५० रुपये भाव वाढल्याने अतिरिक्त कात्री शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहे.अशा वधारल्या खताच्या किंमती

खरीप हंगामापुर्वीच रासायनिक खतांच्या किमतीत १०० ते २५० रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. १०.२६.२६ या खंताची ५० किलोची बॅग १२३५ रूपायांपर्यत मिळायाची, ती आता १३४० रुपये किमतीत घ्यावी लागणार आहे. जवळपास १०५ रुपये अतिरिक्त शेतकऱ्यांना मोजावे लागणार आहेत. डिएपीची बँग १२९० रुपयाऐवजी १४०० रुपये किंमत झाल्याने ११० रुपयाने भाव वाढले आहेत.  तर पोटॅशची बॅग ७०० रुपयावरुन थेट ९०० रुपये किमतीवर गेली आहे. अन्य खतांच्या किमतीतही १०० ते २५० रुपयांनी वाढ झाली आहे.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMalegaonमालेगांव