शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

हवामान बदलाचा फटका : रखरखत्या उन्हातही कांदा काढणीच्या कामांना वेग कांदा उत्पादनात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:11 IST

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाचे लाल सोने काढण्यासाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहे.

ठळक मुद्देउन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाहीपरिसरातील शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त

वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कांदा काढणीच्या कामांना वेग आला असून, रखरखत्या उन्हात मजूर वर्ग व शेतकरी आपल्या चार महिन्याच्या कष्टाचे लाल सोने काढण्यासाठी उन्हाच्या झळा सोसताना दिसत आहे. चालू वर्षी सततच्या हवामान बदलामुळे कांद्याच्या उत्पन्नात सरासरी ३० ते ४० टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सध्या उन्हाळा सुरू असल्याने तपमानात मोठी वाढ झाला आहे. तपमानाने जवळपास चाळिशीचा आकडा गाठल्याचे ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. या जीवघेण्या उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होत असतानाही बागलाण तालुक्यात कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन तापू लागले आहे. रात्री थंडी, तर दिवसा कडक ऊन असल्याने उकाडा चांगलाच जाणवत आहे. तालुक्यातील वटार, डोंगरेज, चौंधाणे, कंधाणे, विंचुरे आदी परिसरातील शेतकरी कांदा काढणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने नदी, नाले, विहिरी, कुपनलिकांना बºयापैकी पाणी असल्यामुळे परिसरात चालू वर्षी कांदा लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र कांद्यासाठी पोषक वातावरण नसल्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत सरासरी उत्पन्नात ३० ते ४० टक्के घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे नागरिकांना दुपारच्या वेळेत घराच्या बाहेर पडू नये असे सांगितले जात असताना दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकरी व मजूर वर्ग चार पैसे मिळावे यासाठी उन्हाच्या झळा सोसत कष्ट करताना दिसतोय. दुपारच्या वेळेस उन्हाची तीव्रता तुलनेने अधिक जाणवत असून, तापलेली जमीन व त्यातून निघणाºया तप्त झळा शेतात काम करणाºया महिला व पुरुषांना चांगलेच चटके देऊन जात आहेत. ज्या शेतकºयांकडे चाळी नाही ते काढणीस आलेला कांदा उन्हाच्या झळांनी सुकून खराब होऊ नये म्हणून कांद्याची पात व उसाच्या पाचटाच्या सहायाने कांद्याचा बचाव करताना दिसत आहे. तर ज्या शेतकºयांकडे चाळी आहेत ते चाळीत साठवणूक करतानाचे चित्र आहे. उन्हामुळे कांदा सडू नये यासाठी आवश्यक ती काळजी घेताना प्रत्येक शेतकरी दिसत आहे. उन्हाच्या तीव्रतेत एवढी वाढ झाली आहे की सकाळी पिकांना पाणी भरलेले असले तरी रात्री जमीन कोरडी पडलेली दिसून येते. पिके सुकू लागली आहेत. भर उन्हात काम करावे लागत असल्याने शेतकरी, मजूरवर्ग संरक्षणासाठी टोप्या, उपरण्याचा वापर करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.