शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवर भुरी करपा, डावणी रोगांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:41 IST

पाटोदा :- मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत जतन केलेल्या द्राक्षबागा यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडल्या आहेत. बागांवर भुरी,करपा, डावणी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडिपीनंतर पडत असलेल्या गेल्या धुक्यामुळे तसेच पहाटेच्या थंडी व दवबिंदूमुळे कुज तसेच गुंडाळी होऊन घड जागेवरच विरघळत आहेत.

ठळक मुद्दे शेतकरी हवालदिल : पाटोदा मंडलातील ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात

पाटोदा :- मागील काही वर्षांपासून दुष्काळाशी सामना करीत जतन केलेल्या द्राक्षबागा यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे अडचणीत सापडल्या आहेत. बागांवर भुरी,करपा, डावणी या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडिपीनंतर पडत असलेल्या गेल्या धुक्यामुळे तसेच पहाटेच्या थंडी व दवबिंदूमुळे कुज तसेच गुंडाळी होऊन घड जागेवरच विरघळत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. बागा जागविण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करीत असून, महागडी औषधे फवारणी करूनही उपयोग होत नसल्याने पाटोदा मंडलातील ७०० हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात आल्या असून, शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.एकट्या पाटोदा कृषी मंडळात सातशे चार हेक्टर द्राक्ष बागांची शेतकऱ्यांना लागवड केली आहे.आॅक्टोबर छाटणी नंतर आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेवरील सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के घड खराब झाले.त्यामुळे द्राक्षउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.उर्वरित घडही धुके व दविबंदूमुळे धोक्यात आले आहे. सध्या हवामानात बदल झाल्यामुळे रोज सकाळ दुपार संध्याकाळ अशी तीन वेळ औषध फवारणी करावी लागत आहे.दिवसाकाठी एक एकर द्राक्षबागेवर सुमारे पाच हजार रु पयांची औषधे लागत आहे.कर्ज काढून बागा वाचिवण्यासाठी धडपड करूनही रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे. द्राक्ष बागांसाठी शेतकºयांनी लाखो रु पयांची गुंतवणूक केली त्यासाठी शेतकरी वर्गाने,बँका,पतसंस्था तसेच खाजगी सावकारांकडून मोठया प्रमाणत कर्ज उचलले आहे.तसेच यावर्षीच्या हंगामासाठी व निर्यातक्षम द्राक्ष पिकविण्यासाठी हेक्टरी पाच ते सहा लाख रु पयांचा खर्च केला मात्र परतीच्या या अवकाळी पावसाने शेतकºयांचे हेक्टरी वीस ते बावीस लाख रु पयांचे नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला आहे. परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे वाटोळे केले आहे बागांवर डावणी तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे दिवसाकाठी एकरी पाच ते सात हजार रु पयांचे महागडी औषधे फवारणी करावी लागत आहे ही औषध फवारणी करूनही बदलत्या हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी होन्याऐवजी वाढतच आहे त्यामुळे आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.-रवींद्र शेळके, द्राक्ष उत्पादक शेतकरी ठाणगाव कोरड्या दुष्काळाचा सामना करीत द्राक्ष उत्पादन करणाº्या द्राक्ष उत्पादक शेतकº्यांना यावर्षी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.या ओल्या दुष्काळामुळे संपूर्ण द्राक्ष बागा शोभेच्या झाल्या आहेत. तब्बल महिनाभर पावसाने धुमाकूळ घातल्याने या बागांमध्ये अद्यापही चिखल व दलदल आहे.येवला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातीलपाटोदा,दहेगावपाटोदा,ठाणगाव,पिंपरी,धुळगाव,कानडी,विखरणी,आडगाव रेपाळ,शिरसगाव,लौकी,वळदगाव,पिंपळगावलेप, जऊळ्के,सतारे आदि भागात द्राक्ष पिकांचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे.पाटोदा कृषी मंडळात सुमारे सातशे हेक्टर द्राक्ष बागांची शेतकरी वर्गाने लागवड केली आहे मात्र परतीच्या पावसाने या संपूर्ण द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहे .त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे .कृषी विभागाच्या वतीने द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना औषध फवारणी बाबत मारगदर्शन केले जात आहे,- प्रकाश जवणे, कृषी सहाय्यक पाटोदा कृषी मंडळ.