शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 00:57 IST

एकलहरे: नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक कट्यावर, चौकात घोळक्याने विना मास्क गप्पा मारतांना दिसतात.काही गुटका, तंबाखु, मावा खाणारे भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी थुंकुन घाण करतात. अशा व्यक्तींवर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

ठळक मुद्देनागरिक बिनधास्त: मास्कचा अभाव, जागोजागी गर्दी

एकलहरे: नाशिक तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी नागरिक मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र दिसत आहे. अनेक नागरिक कट्यावर, चौकात घोळक्याने विना मास्क गप्पा मारतांना दिसतात.काही गुटका, तंबाखु, मावा खाणारे भररस्त्यात, सार्वजनिक ठिकाणी थुंकुन घाण करतात. अशा व्यक्तींवर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.एकलहरे परिसरातील सामनगाव, चाडेगाव,कोटमगाव, जाखोरी, चांदगिरी, मोहगाव, बाभळेश्वर, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर,एकलहरेगाव, गंगावाडी या भागात कोरोनाबाबत जनजाग्रुती करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, बचतगट प्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांचे पथक तयार करुन नागरिकांमध्ये विविध माध्यमातून जनजाग्रुती करीत आहेत. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून गावातून, वस्ती,वाडी,मळ्यातून औषध फवारणी केली जाते.मात्र काही नागरिक या गोष्टी गांभिर्याने घेतांना दिसत नाहीत.किराणा दुकान, दवाखाने, मेडिकल दुकान, भाजी बाजार, हॉटेल, पानटपरी,कापडदुकान, गँरेज, टपाल कार्यालय, बँक,पेट्रोलपंप, स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी नागरिक मास्क न वापरता फिरतात. ग्रामिण भागात गेल्या आठ पंधरा दिवसात वयस्कर व्यक्ती, विविध आजारांनी ग्रस्त व्यक्ती व काही प्रमाणात कोरोनाग्रस्त यांचा म्रुत्यूदर वाढला आहे. त्यामुळे निधन, दहावे, शोकसभा, वर्षश्राध्द, लग्न समारंभ या निमित्ताने नागरिकांची गर्दी होत आहे. सद्या पित्रुपक्ष असल्याने त्यासाठी स्वयंपाक व जेवणखान यासाठिही लोक एकत्र जमत असून, मात्र फिझिकल डिस्टन्सिंग व मास्क वापरण्याकडे अनेकजण दूर्लक्ष करतात. घरगुती कार्यक्रम सोडले तर सार्वजनिक ठिकाणी नियमांची पायमल्ली होते त्याकडे स्थानिक प्रशासन 'गावचा मामला' म्हणून दूर्लक्ष करतांना दिसते. या सगळ्याचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढतांना दिसतो. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या