शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मन:स्वास्थ ठीक असेल तर प्रमाणपत्र सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:53 IST

महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे.

नाशिक : महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे. अर्थात, आजारपणाची रजा घेतल्यानंतर ज्याप्रमाणे रुजू होताना संबंधित कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश हे प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. त्यानुसार त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्याचे लेखीपत्र दिल्याचे सांगण्यात आले.नाशिक महापालिकेत कामाचा अतिताण असल्याचे सांगण्यात येत असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यशैली त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. मार्च महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम सुरू झाला होता. नाशिकरोड येथील शाळा क्रमांक १२५च्या मैदानात हा कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी पहाटे या कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून पाटील घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी त्यांची मोटार तेथेच आढळल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबीयांनी मोटार तपासली असताना त्यात पाटील यांनी आपण कामाच्या अति ताणामुळे जात असल्याचे नमूद केले होते, व जिवाचे बरे वाईट करणार असल्याचेही त्यात नमूद असल्याने शहरात खळबळ उडाली होती.आठ दिवस पाटील हे बेपत्ता असल्याने अनेक शंका व कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच ते पुणे येथे असल्याचे पोलिसांना कळाले आणि नंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप घरी पोहोचवले. दरम्यान, पाटील यांनी महापालिकेत तत्काळ रुजू न होता आपले मनस्वास्थ ठीक नसल्याने रुजू होत नसल्याचे कारण दिले, त्यानंतर एप्रिल ते जुलैपर्यंत रजा घेतली होती.प्रमाणपत्रानंतरच करून घेणार रूजू रवि पाटील आता रुजू होण्यास उत्सुक असून, त्या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे अर्ज दिला आहे. त्यावर महापालिकेने प्रत्युत्तर दिले असून, त्यांना मुंबई येथील मेडिकल बोर्डाकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका