शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

मन:स्वास्थ ठीक असेल तर प्रमाणपत्र सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:53 IST

महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे.

नाशिक : महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे. अर्थात, आजारपणाची रजा घेतल्यानंतर ज्याप्रमाणे रुजू होताना संबंधित कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश हे प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. त्यानुसार त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्याचे लेखीपत्र दिल्याचे सांगण्यात आले.नाशिक महापालिकेत कामाचा अतिताण असल्याचे सांगण्यात येत असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यशैली त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. मार्च महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम सुरू झाला होता. नाशिकरोड येथील शाळा क्रमांक १२५च्या मैदानात हा कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी पहाटे या कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून पाटील घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी त्यांची मोटार तेथेच आढळल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबीयांनी मोटार तपासली असताना त्यात पाटील यांनी आपण कामाच्या अति ताणामुळे जात असल्याचे नमूद केले होते, व जिवाचे बरे वाईट करणार असल्याचेही त्यात नमूद असल्याने शहरात खळबळ उडाली होती.आठ दिवस पाटील हे बेपत्ता असल्याने अनेक शंका व कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच ते पुणे येथे असल्याचे पोलिसांना कळाले आणि नंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप घरी पोहोचवले. दरम्यान, पाटील यांनी महापालिकेत तत्काळ रुजू न होता आपले मनस्वास्थ ठीक नसल्याने रुजू होत नसल्याचे कारण दिले, त्यानंतर एप्रिल ते जुलैपर्यंत रजा घेतली होती.प्रमाणपत्रानंतरच करून घेणार रूजू रवि पाटील आता रुजू होण्यास उत्सुक असून, त्या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे अर्ज दिला आहे. त्यावर महापालिकेने प्रत्युत्तर दिले असून, त्यांना मुंबई येथील मेडिकल बोर्डाकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका