शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

मन:स्वास्थ ठीक असेल तर प्रमाणपत्र सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:53 IST

महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे.

नाशिक : महापालिकेतील छळाला कंटाळून आठ दिवस बेपत्ता झालेले नगररचना विभागाचे अभियंता रवि पाटील नंतर सुखरूप परतले, परंतु मन:स्वास्थ ठीक नसल्याने ते गेले तीन महिने रजेवर होते, मात्र आता त्यांनी कामावर रुजू होण्याची तयारी दर्शविली असली तरी त्यांना आधी मन:स्वास्थ ठीक असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करा, मगच रुजू व्हा, असे प्रशासनाने सांगत परत पाठविले आहे. अर्थात, आजारपणाची रजा घेतल्यानंतर ज्याप्रमाणे रुजू होताना संबंधित कर्मचाऱ्यांना तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश हे प्रशासकीय प्रक्रियेचा भाग आहे. त्यानुसार त्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्याचे लेखीपत्र दिल्याचे सांगण्यात आले.नाशिक महापालिकेत कामाचा अतिताण असल्याचे सांगण्यात येत असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांची कार्यशैली त्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. मार्च महिन्यात आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ‘वॉक विथ कमिशनर’ कार्यक्रम सुरू झाला होता. नाशिकरोड येथील शाळा क्रमांक १२५च्या मैदानात हा कार्यक्रम होत असताना त्याच दिवशी पहाटे या कार्यक्रमासाठी जात असल्याचे सांगून पाटील घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना सकाळी त्यांची मोटार तेथेच आढळल्याने त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यामुळे कुटुंबीयांनी मोटार तपासली असताना त्यात पाटील यांनी आपण कामाच्या अति ताणामुळे जात असल्याचे नमूद केले होते, व जिवाचे बरे वाईट करणार असल्याचेही त्यात नमूद असल्याने शहरात खळबळ उडाली होती.आठ दिवस पाटील हे बेपत्ता असल्याने अनेक शंका व कुशंका व्यक्त केल्या जात असतानाच ते पुणे येथे असल्याचे पोलिसांना कळाले आणि नंतर पोलिसांनी त्यांना सुखरूप घरी पोहोचवले. दरम्यान, पाटील यांनी महापालिकेत तत्काळ रुजू न होता आपले मनस्वास्थ ठीक नसल्याने रुजू होत नसल्याचे कारण दिले, त्यानंतर एप्रिल ते जुलैपर्यंत रजा घेतली होती.प्रमाणपत्रानंतरच करून घेणार रूजू रवि पाटील आता रुजू होण्यास उत्सुक असून, त्या संदर्भात त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे अर्ज दिला आहे. त्यावर महापालिकेने प्रत्युत्तर दिले असून, त्यांना मुंबई येथील मेडिकल बोर्डाकडून तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे असे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना रुजू करून घेतले जाणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका