शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

...तर बोगद्याच्या रुंदीकरणासाठी उड्डाणपूलच तोडावा लागेल!

By admin | Updated: August 4, 2015 23:45 IST

पोलीस आयुक्तांचे अजब फंडे : अशक्यप्राय उपाय सुचवून नागरिकांना केले हतबल

नाशिक : इंदिरानगर येथील बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी बोगदा रुंदीकरणाचा उपाय सुचविला आहे. रुंदीकरण करणे अशक्य नाही, परंतु व्यवहार्यही नाही. कारण रुंदीकरण करायचे झाले तर उड्डाणपूलच तोडावा लागणार आहे. तज्ज्ञांनीच याबाबत मत व्यक्त केले आहे. त्यामुळे बोगदा खुला न करण्याच्या मानसिकेत असलेल्या आयुक्तांकडून हेतुपूर्वक अशक्यप्राय उपाय सुचवून नागरिकांना हतबल केले जात असल्याचेच चित्र दिसत आहे. मुंबई-आग्रा रोडवर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा उड्डाणपूल असलेल्या या विक्रमवीर पुलाच्या अडचणींमुळे नागरिक मेताकुटीस आले आहेत. त्यातच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळून गोविंदनगरला जोडणारा उड्डाणपुलाखालील बोगदा हा सध्या वादाचा विषय बनला आहे. दोन भागांना जोडणाऱ्या या बोगद्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलीस आयुक्तांनी अन्य कोणतीही उपाययोजना करण्यापेक्षा वाहतुकीसाठी बोगदा बंद करून केवळ पादचाऱ्यांसाठीच त्याचा वापर सुरू ठेवला. त्यामुळे वाहतुकीला मोठा वळण घ्यावा लागत असल्याने इंदिरानगर आणि अन्य भागातील नागरिक त्रस्त आहेत.