शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

कवी थरथरला तर साम्राज्ये उलथली जातात :  रंगनाथ पठारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:22 IST

कविता सत्य तेच बोलते, त्यामुळेच कवी झाडासारखा थरथरला तरी मोठमोठी साम्राज्येही उलथली जातात.

नाशिक : कविता सत्य तेच बोलते, त्यामुळेच कवी झाडासारखा थरथरला तरी मोठमोठी साम्राज्येही उलथली जातात. सत्तेची उलथापालथ करण्याचे सामर्थ्य कवितेत असून, आणीबाणीसारख्या काळात कवींना शीर्षस्थानी यावे लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.पुस्तक पेठ व पॉप्युलर प्रकाशन यांच्यातर्फे कुसुमाग्रज स्मारकात कवी सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांच्या ‘बाउल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रंगनाथ पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पठारे म्हणाले, आयुष्यात काही सुंदर गोष्टी येतात, तसेच काही जिवाच्याही येतात, त्यापैकी एक म्हणजे किशोर असून, तो अद्भुत नट आहे. भूमिकेत शिरणे, त्याचा भाग होणे हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. बाउल म्हणजे माणसाला माणूस म्हणून व्यक्त होण्याच्या कसोशीचा प्रयत्न असल्याचे रंगनाथ पठारे यांनी यावेळी अधोरेखित केले. तर कवी संजय जोशी यांनी सौमित्र, कविता व बाउल याविषयी दीर्घकविता सादर केली. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते व शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निखिल दाते यांनी केले.पठारे म्हणाले, ज्या समाजव्यवस्थेमध्ये कवी शीर्षस्थानी असतो ती दुनिया नीटनेटकी असते. अशा कवितेत जगणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे, खरे तर कवीने समाजामध्ये असणे ही मोलाची गोष्ट आहे. कारण त्याच्या सामर्थ्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक