शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कवी थरथरला तर साम्राज्ये उलथली जातात :  रंगनाथ पठारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:22 IST

कविता सत्य तेच बोलते, त्यामुळेच कवी झाडासारखा थरथरला तरी मोठमोठी साम्राज्येही उलथली जातात.

नाशिक : कविता सत्य तेच बोलते, त्यामुळेच कवी झाडासारखा थरथरला तरी मोठमोठी साम्राज्येही उलथली जातात. सत्तेची उलथापालथ करण्याचे सामर्थ्य कवितेत असून, आणीबाणीसारख्या काळात कवींना शीर्षस्थानी यावे लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले.पुस्तक पेठ व पॉप्युलर प्रकाशन यांच्यातर्फे कुसुमाग्रज स्मारकात कवी सौमित्र ऊर्फ किशोर कदम यांच्या ‘बाउल’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रंगनाथ पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पठारे म्हणाले, आयुष्यात काही सुंदर गोष्टी येतात, तसेच काही जिवाच्याही येतात, त्यापैकी एक म्हणजे किशोर असून, तो अद्भुत नट आहे. भूमिकेत शिरणे, त्याचा भाग होणे हे त्याच्याकडून शिकण्यासारखे आहे. बाउल म्हणजे माणसाला माणूस म्हणून व्यक्त होण्याच्या कसोशीचा प्रयत्न असल्याचे रंगनाथ पठारे यांनी यावेळी अधोरेखित केले. तर कवी संजय जोशी यांनी सौमित्र, कविता व बाउल याविषयी दीर्घकविता सादर केली. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते व शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन निखिल दाते यांनी केले.पठारे म्हणाले, ज्या समाजव्यवस्थेमध्ये कवी शीर्षस्थानी असतो ती दुनिया नीटनेटकी असते. अशा कवितेत जगणे ही सर्वांत कठीण गोष्ट आहे, खरे तर कवीने समाजामध्ये असणे ही मोलाची गोष्ट आहे. कारण त्याच्या सामर्थ्याची तुलना कुणाशीही होऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिक