शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल जमा केले असते तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 00:45 IST

कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.

पंचवटी : कौटुंबिक वादातून आलेल्या रागाच्या भरात पोलीस नाईक संजय भोये याने आपल्या मुलांवर गोळ्या झाडून ठार मारल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. भोये यांनी ड्यूटी संपल्यानंतर उपनगर पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात सर्व्हिस रिव्हॉल्वर जमा केले असते तर कदाचित गोळीबाराची घटना हाणामारीवर निभावली असती, अशी चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.पेठरोडवरील अश्वमेधनगरच्या राजमंदिर सोसायटीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण शहरच हादरले. त्याला कारणही तसेच होते, पोलीस पिता असलेल्या भोये यांनी कौटुंबिक वादातून दोघा मुलांवर पिस्तूल रोखून चार फैरी झाडल्या होत्या. एकाच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या छातीत गोळी लागल्याने अतिरक्तस्त्राव होऊन सोनू चिखलकर याचा घटनास्थळी तर शुभमचा रु ग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ैबीटमार्शल म्हणून क र्तव्य बजावणारे भोये यांना पोलीस ठाण्यातून त्यांच्या नावावर पिस्तूलसह ३० जिवंत काडतुसे देण्यात आलेली होती. नियमानुसार ड्यूटी संपल्यावेळी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यातून दिलेले शस्त्र, रायफल असो की रिव्हॉल्व्हर लागलीच शस्त्रागार कक्षात जमा करणे बंधनकारक असते. गुरुवारच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी असूनही भोये यांनी पिस्तूल व काडतुसे सोबत बाळगली. ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे, मात्र पोलीस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडलेल्या या घटनेने समोर आला आहे.शस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावरया घटनेनंतर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या शस्त्रांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्नही चव्हाट्यावर आला आहे. ड्यूटी संपल्यानंतर अधिकारी, कर्मचाºयांकडून आपली शस्त्रे पोलीस ठाण्यातील शस्त्रागारात नियमितपणे जमा केली जातात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याबाबत लक्ष घालून कर्मचाºयांना कर्तव्यावर असताना दिलेले शस्त्र कर्तव्य आटोपल्यानंतर तत्काळ शस्त्रागारामध्ये जमा करण्याबाबत आदेश देणे गरजेचे आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक