शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
3
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
4
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
5
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
6
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
7
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
8
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
9
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
10
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
11
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
12
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
13
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
14
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
15
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
16
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
17
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
18
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
19
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
20
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

कांदा परवडत नसेल तर खाऊ नका! : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:58 IST

कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील.

लासलगाव/निफाड : कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील. कांदा ५०-६० रु पये किलो झाला की, लगेच ओरड सुरु होते. हे कोठेतरी थांबायला हवे. जर कांदा खायचाच असेल तर स्वत: शेत घ्या, नींदणी करा, तेव्हाच शेतकºयाचे दु:ख कळेल, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणीप्रसंगी निफाड तालुक्यातील कोळवाडी (श्रीरामनगर) येथे ते बोलत होते. खोत पुढे म्हणाले, ‘परतीच्या पावसाने यंदा कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा ५०-६० रु पये किलो दराने खावा लागला, तर खाल्ला पाहिजे. कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी ३-४ महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. यंदा अतिपावसाने कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कांदा लागवड क्षेत्रही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेची कांद्याची मागणी लक्षात घेऊन पुरवठा करण्याचे धोरण शासनातर्फेराबवले जाईल, असे सांगून सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असे आश्वासन खोत यांनी दिले. कांद्याचे भाव अनेकदा अस्थिर होतात. त्यावेळी देशभरात फक्त कांद्याची चर्चा केली जाते. त्यासाठी कांदा आयात-निर्यातीचे किमान पाच वर्षांचे कायमस्वरूपी धोरण आखणे गरजेचे आहे. भविष्यात शेतकऱ्यांना फायदा करून द्यायचा असेल, तर कांदा निर्यातीचा निर्णय केंद्रसरकारला घ्यावा लागेल, असेही खोत म्हणाले.श्रीरामनगर येथे ढगफुटी व गारपीट होऊन द्राक्षबागा व मका पिकाचे नुकसान झाले. या क्षेत्राची पाहणी त्यांनी केली. शनिवारी मदत व पुनर्वसन समितीची मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीत अहवाल मांडणार असल्याचे खोत म्हणाले. श्रीरामनगर येथील कोंडाजी शिंदे यांच्या द्राक्षबागेचे व मका पिकाचेही नुकसान झाले. या बागेला खोत यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी भीमराज काळे, संपत खताळे, रावसाहेब गोळे, रवींद्र शिंदे यांनी समस्यांचा पाढा वाचला.

टॅग्स :onionकांदाSadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेती