शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कांदा परवडत नसेल तर खाऊ नका! : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 01:58 IST

कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील.

लासलगाव/निफाड : कांद्याचा प्रश्न राज्यात आणि देशात ज्वलंत झालेला आहे. माझा नेहमीचा प्रश्न आहे, कांदा परवडत नसेल तर तो खाऊ नका त्यामुळे काही फरक पडत नाही. किमान माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे तरी मिळतील. कांदा ५०-६० रु पये किलो झाला की, लगेच ओरड सुरु होते. हे कोठेतरी थांबायला हवे. जर कांदा खायचाच असेल तर स्वत: शेत घ्या, नींदणी करा, तेव्हाच शेतकºयाचे दु:ख कळेल, असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणीप्रसंगी निफाड तालुक्यातील कोळवाडी (श्रीरामनगर) येथे ते बोलत होते. खोत पुढे म्हणाले, ‘परतीच्या पावसाने यंदा कांद्याचे मोठे नुकसान होणार आहे. परिणामी कांद्याचे दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत कांदा ५०-६० रु पये किलो दराने खावा लागला, तर खाल्ला पाहिजे. कांदा हा काही अणुबॉम्ब नाही. शेतकरी ३-४ महिन्यात लागेल तितका कांदा पिकवू शकतो. यंदा अतिपावसाने कांद्याचे उत्पादन घटणार आहे. कांदा लागवड क्षेत्रही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत बाजारपेठेची कांद्याची मागणी लक्षात घेऊन पुरवठा करण्याचे धोरण शासनातर्फेराबवले जाईल, असे सांगून सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेईल, असे आश्वासन खोत यांनी दिले. कांद्याचे भाव अनेकदा अस्थिर होतात. त्यावेळी देशभरात फक्त कांद्याची चर्चा केली जाते. त्यासाठी कांदा आयात-निर्यातीचे किमान पाच वर्षांचे कायमस्वरूपी धोरण आखणे गरजेचे आहे. भविष्यात शेतकऱ्यांना फायदा करून द्यायचा असेल, तर कांदा निर्यातीचा निर्णय केंद्रसरकारला घ्यावा लागेल, असेही खोत म्हणाले.श्रीरामनगर येथे ढगफुटी व गारपीट होऊन द्राक्षबागा व मका पिकाचे नुकसान झाले. या क्षेत्राची पाहणी त्यांनी केली. शनिवारी मदत व पुनर्वसन समितीची मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीत अहवाल मांडणार असल्याचे खोत म्हणाले. श्रीरामनगर येथील कोंडाजी शिंदे यांच्या द्राक्षबागेचे व मका पिकाचेही नुकसान झाले. या बागेला खोत यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी भीमराज काळे, संपत खताळे, रावसाहेब गोळे, रवींद्र शिंदे यांनी समस्यांचा पाढा वाचला.

टॅग्स :onionकांदाSadabhau Khotसदाभाउ खोत agricultureशेती