शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

शास्रोक्त पद्धतीने लागवड केल्यास भाताच्या उत्पादनात ४० टक्के वाढ शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 23:58 IST

नाशिक : पारंपरिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल करून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास रोपही कमी लागते आणि उत्पादनातही सुमारे ४० टक्के वाढ होते.

नाशिक : पारंपरिक भात लागवडीच्या पद्धतीत बदल करून चारसूत्री पद्धतीने लागवड केल्यास रोपही कमी लागते आणि उत्पादनातही सुमारे ४० टक्के वाढ होते. भात पिकविणारा शेतकरी हा मुख्यत: आदिवासी असून, त्यांना भात लागवड परवडत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे शास्रोक्त लागवडीचा अभाव.उत्पादनवाढीसाठी डॉ. नारायण सावंत आणि श्रीपाद दप्तरदार यांनी राहुरी व दापोली कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केलेल्या चारसूत्री भात शेतीचा अवलंब केल्यास निश्चितच भात उत्पादनात वाढ होते. शिवाय रोपही कमी प्रमाणात लागून लागवड खर्चात बचत होते, अशी माहिती सेवानिवृत्त कृषी अधिकारी अच्युत जकातदार यांनी दिली आहे.-------------------------------------१) चारसूत्री पद्धतीत भाताच्या बियाण्याची४० ते ५० टक्केपर्यंत बचत होते. त्याच प्रमाणात रोपे तयार करणे व लावणीचा खर्च कमी होऊ शकतो. रासायनिक खताच्या खर्चातही४४ टक्के पर्यंत बचत होते.२)  तणाचा त्रास कमी होतो त्यामुळे तण काढण्याच्या खर्चात बचत होते. आंतर मशागत करणे सोपे होते. पिकात हवा खेळती राहात असल्यामुळे रोग, किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.३)  ५० टक्क्यांपर्यंत भाताच्या पेध्याचे वजन वाढते. फुटव्यांच्या संख्येत वाढ होते. ओबीचे वजन वाढते. आशा विविध कारणांमुळे भाताच्या उत्पादनात ३५ ते ४० टक्के उत्पादन वाढते, असे जकातदार यांनी सांगितले.-----------------प्राप्त परिस्थिती-मध्ये सुधारित जातीच्या मदतीने खताचे योग्य व्यवस्थापन केले तर निश्चितपने भाताच्या उत्पादनात वाढ होऊन शेतकरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारू शकतो. उत्पादकता वाढविण्यासाठी चारसूत्री पद्धतीचा वापर करणे अनिवार्य झाले आहे. शेतकऱ्यांनी याची अंमलबाजावणी केल्यास पीक वाढेल.- अच्युत जकातदार, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, नाशिक

 

टॅग्स :Nashikनाशिक