शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

राज्य, आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:47 IST

नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे

ठळक मुद्देहजारो मजूर अडकलेखातरजमा होणारपोलीस महासंचालकांना अधिकार

नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने २३ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन जाहीर केले असून, ज्याठिकाणी लोक आहेत त्यांना तेथेच थांबायचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील व राज्यातील विविध ठिकाणी हजारो नागरिक अडकून पडले असून रेल्वे, बस, विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. अडकून पडलेल्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. खिशातील पैसे संपत आले, तर पैसे असूनही वस्तू खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे दररोज हजारो अर्ज, विनंत्या केल्या जात असून, त्यातील काही कारणे खरोखरच योग्य व खऱ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, परंतु नागरिकांची अडचण दूर होईल असा विचार करून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने काही अटी-शर्तींवर प्रवास करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने एखाद्या नागरिकास सध्या रहिवासी जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामधून दुस-या जिल्ह्यात प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर त्या नागरिकाची प्रवासाची कारणमीमांसा, खातरजमा करून संबंधित पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांनी त्या नागरिकास परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याचबरोबर राज्यातील नागरिकास दुसºया राज्यात प्रवास करणे गरजेचे असेल अशा नागरिकांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी मिळविण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माल वाहतूक करणा-या वाहनांना माल वाहतुकीची परवानगी असल्याने त्या वाहनांना अटकाव करू नये, अशा वाहनांना परवानगीची गरज नसल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार