शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

राज्य, आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:47 IST

नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे

ठळक मुद्देहजारो मजूर अडकलेखातरजमा होणारपोलीस महासंचालकांना अधिकार

नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने २३ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन जाहीर केले असून, ज्याठिकाणी लोक आहेत त्यांना तेथेच थांबायचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील व राज्यातील विविध ठिकाणी हजारो नागरिक अडकून पडले असून रेल्वे, बस, विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. अडकून पडलेल्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. खिशातील पैसे संपत आले, तर पैसे असूनही वस्तू खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे दररोज हजारो अर्ज, विनंत्या केल्या जात असून, त्यातील काही कारणे खरोखरच योग्य व खऱ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, परंतु नागरिकांची अडचण दूर होईल असा विचार करून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने काही अटी-शर्तींवर प्रवास करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने एखाद्या नागरिकास सध्या रहिवासी जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामधून दुस-या जिल्ह्यात प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर त्या नागरिकाची प्रवासाची कारणमीमांसा, खातरजमा करून संबंधित पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांनी त्या नागरिकास परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याचबरोबर राज्यातील नागरिकास दुसºया राज्यात प्रवास करणे गरजेचे असेल अशा नागरिकांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी मिळविण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माल वाहतूक करणा-या वाहनांना माल वाहतुकीची परवानगी असल्याने त्या वाहनांना अटकाव करू नये, अशा वाहनांना परवानगीची गरज नसल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार