शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

राज्य, आंतरराज्य प्रवासाला परवानगी देण्याचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:47 IST

नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे

ठळक मुद्देहजारो मजूर अडकलेखातरजमा होणारपोलीस महासंचालकांना अधिकार

नाशिक : देशात अचानक लागू करण्यात आलेली संचारबंदी व लॉकडाउनमुळे देशातील विविध भागात तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हजारो नागरिक अडकून पडले आहेत. लॉकडाउनच्या आठ दिवसांनंतर अशा लोकांचा धीर सुटू लागल्याचे पाहून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा विचार केला जात आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाला याबाबत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करता राज्य व आंतरराज्य प्रवासाला सबळ कारणांमुळे अनुमती देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.

कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने २३ मार्चपासून संचारबंदी व लॉकडाउन जाहीर केले असून, ज्याठिकाणी लोक आहेत त्यांना तेथेच थांबायचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे देशातील व राज्यातील विविध ठिकाणी हजारो नागरिक अडकून पडले असून रेल्वे, बस, विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. अडकून पडलेल्या नागरिकांची अवस्था बिकट झाली आहे. खिशातील पैसे संपत आले, तर पैसे असूनही वस्तू खरेदी करता येत नाही. अशा परिस्थितीत राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडे दररोज हजारो अर्ज, विनंत्या केल्या जात असून, त्यातील काही कारणे खरोखरच योग्य व खऱ्या असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, परंतु नागरिकांची अडचण दूर होईल असा विचार करून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाने काही अटी-शर्तींवर प्रवास करण्यास अनुमती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रामुख्याने एखाद्या नागरिकास सध्या रहिवासी जिल्ह्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामधून दुस-या जिल्ह्यात प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर त्या नागरिकाची प्रवासाची कारणमीमांसा, खातरजमा करून संबंधित पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक यांनी त्या नागरिकास परवानगी देण्याबाबत निर्णय घ्यावा, त्याचबरोबर राज्यातील नागरिकास दुसºया राज्यात प्रवास करणे गरजेचे असेल अशा नागरिकांनी फक्त अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी मिळविण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयात अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

माल वाहतूक करणा-या वाहनांना माल वाहतुकीची परवानगी असल्याने त्या वाहनांना अटकाव करू नये, अशा वाहनांना परवानगीची गरज नसल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी काढले आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार