शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

भुसणीच्या मार्कंडेय नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन

By admin | Updated: October 6, 2015 22:20 IST

शेतकऱ्यांना वरदान : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळवण गटात एक हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

कळवण : जिल्हा परिषद व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील भुसणी शिवारातील मार्कंडेय नदीवर दोन सीमेंट बंधारे बांधण्यात आले. हे बंधारे ओसंडून वाहत असल्याने परिसरातील शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले असून, परिसराला नवसंजीवनी मिळणार असल्याने या परिसरातील शेतकरीबांधवांनी या बंधाऱ्यांचे जिल्हा परिषद सदस्य रवींद्र देवरे यांच्या हस्ते जलपूजन केले. जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होईल. शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होऊन शेतकरी सुखी होऊन आर्थिक सुबत्ता नांदेल. पाणी अडविले जाऊन शिवार जलमुक्त होणार असून, यासाठी तालुक्यातील ११ गावांची जलयुक्त शिवार अभियानात निवड करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार अभियान हे टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रभावीपणे राबविल्याने कळवण जिल्हा परिषद गटात वर्षभरात १७ सीमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण झाल्याने जवळपास एक हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य रवींद्र देवरे यांनी दिली. मार्कंडेय नदी पावसाळा संपल्यानंतर तीन ते चार महिने वाहत होती. असे असताना या परिसराला एप्रिल ते जूनपर्यंत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असे. आता मात्र हे सीमेंट बंधारे बांधण्यात आल्याने बंधाऱ्यापासून अर्धा किमीपेक्षा जास्त पाण्याची साठवण होत आहे. परिणामी विहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून, उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही. शिवाय पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या बंधाऱ्यांमुळे उन्हाळी पीक आता शेतकऱ्यांना घेता येणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पूजनावेळी भुसणी येथील शेतकरी नामदेव खैरनार, विजय सूर्यवंशी, मिलिंद खैरनार, बापू खैरनार, नंदकुमार खैरनार, राजेंद्र पगार, रामदास सूर्यवंशी, युवराज सोनवणे, विष्णू अहेर, राजेंद्र खैरनार, बापू अहेर, सचिन खैरनार, सुधाकर खैरनार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)