शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात १ एप्रिलला हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:42 IST

नाशिक : शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने २३ मार्चपासून सुरू केलेली हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा १ एप्रिलला नाशिक शहरात पोहोचणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात राज्य सुकाणू समिती सदस्य राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २८) नाशिक जिल्हा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देनियोजन बैठक : राज्य सुकाणू समितीचे सदस्य होणार सहभागीआगामी आंदोलनाची दिशा ठरणार

नाशिक : शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने २३ मार्चपासून सुरू केलेली हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा १ एप्रिलला नाशिक शहरात पोहोचणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात राज्य सुकाणू समिती सदस्य राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. २८) नाशिक जिल्हा शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली.राज्य सुकाणू समितीचे सदस्य नाशिक जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ रोजी पोहोचणार असून, या हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेत हुतात्मा स्मारक येथे सकाळी ९ वाजता शेतकरी आंदोलनात प्राणांचे बलिदान देणाऱ्या शेतकºयांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर ११ वाजता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुकाणू समिती सदस्य शेतकºयांशी संवाद साधणार आहेत. याच ठिकाणी राज्यातील विविध शेतकरी संघटनांची सुकाणू समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. दुपारी २ वाजता पिंपळगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकºयांशी संवाद साधण्यात येणार आहे. शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी ४.३० वा. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेची माहिती माध्यमांना देण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा समृद्धी महामार्ग बाधित शेतकरी संघर्षाची शिवडे येथे सभा होणार आहे. तत्पूर्वी पांढुर्ली येथे विषप्राशन करणाºया शेतकरी कुटुंबाची सुकाणू समितीचे सर्व सदस्य भेट घेणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा सुकाणू समितीतर्फे देण्यात आली आहे. या दौºयात शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील, नामदेव गावडे, किशोर ढमाले, प्रतिभा शिंदे, गणेश जगताप आदी सहभागी होणार आहेत. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत बुधवारी यात्रेचे नियोजन करण्यात आले असून, करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, भास्करराव शिंदे, प्रभाकर वाययळे, विलास जाधव, नामदेव बोराडे, निवृत्ती कसबे, उत्तम हारक आदींवर ही जबाबदारी सोपविण्यात आली. स्वप्निल घिया, विलास जाधव, नामदेव बोराडे, विजय दराडे, निवृत्ती कसबे, दिलीप निमसे, सचिन पवार, नीलेश मोरे, दर्शन बोरस्ते, संपत थेटे, अमित जाधव, शिवाजी मोरे, नंदकुमार कर्डक, उत्तम हारक, सोमनाथ वाघ, नितीन भुजबळ आदी उपस्थित होते.

आगामी आंदोलनाची दिशा ठरणारहुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रेच्या माध्यमातून बंद उपसा जलसिंचन संचांचे कर्ज माफ करा, शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, विविध कार्यकारी सोसायट्यांना थेट कर्जपुरवठा करा आदी मागण्यांवर विचार करण्यासोबतच आगामी काळातील आंदोलनाच्या दिशा ठरविण्यासाठीही राज्य सुकाणू समिती सदस्य मार्गदर्शन करणार आहेत.