शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

गारठयाने नाशिककरांना भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:44 IST

नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, गारठ्याने नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १०.८ अंश इतके नोंदविले गेले. तर त्याच वेळी निफाडचे तपमान सर्वात कमी म्हणजे ...

ठळक मुद्देपारा १०.८ अंशावर : पिकांवर परिणाम, संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ

नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, गारठ्याने नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १०.८ अंश इतके नोंदविले गेले. तर त्याच वेळी निफाडचे तपमान सर्वात कमी म्हणजे ८.७ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या बुधवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते. शहराच्या किमान तपमानाचा पारा मागील आठवड्यात चढता राहिला; मात्र त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची तीव्रता शहरात वाढल्याचे जाणवत आहे.रविवारपासून हवेमध्ये कमालीचा गारवा जाणवू लागल्याने पाºयामध्येही घसरण होत आहे. या उतरत्या पाºयामुळे आणि वाढत्या थंडीमुळे पिकांवरही त्याचा परिणाम जाणवतो असून दिवाळीपुर्वीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर आता परत एकदा निसर्गाचा फटका सहन करावा लागणार की काय अशी भिती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वाढत्या गारव्यामुळे अबालवृद्धांना सर्दी, खोकला, ताप आदि संसर्गजन्य आजाराची लागण होत असून आजारांमुळे गुलाबी थंडीचा आस्वाद घेणे मुश्किल झाले आहे. एकीकडे किमान तपमानाचा पारा उतरता असला, तरी दुसरीकडे मात्र कमाल तपमानाचा पारा चढता असल्याने नाशिककरांना दिवसा उन्हाचा चटकाही जाणवत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा निर्माण होत असून, थंडी जाणवण्यास सुरुवात होत आहे. एकूणच सध्या नाशिककर हिवाळ्यासोबत उन्हाळाही अनुभवत आहेत. सकाळी १० वाजेपासून नाशिककर उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसभर उकाडाही अनुभवत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वातानुकूलन यंत्रासह पंख्याचा वापर नागरिक दुपारी करत आहेत. संध्याकाळपासून थंडीची तीव्रता जाणवण्यास सुरुवात होते. त्यामुळे गोदाकाठावर व तपोवन परिसरात उघड्यावर राहणाºया भटक्या कुटुंबीयांकडून शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी किमान तपमानाचा पारा १० अंशापर्यंत घसरला होता. यावर्षी केवळ एक अंशाने यादिवशी पारा चढता राहिला आहे.