शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
2
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
3
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
4
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
5
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
8
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
9
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
10
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
11
T20 Word Cup: ४ परदेशी खेळाडूंना भारताचा व्हिसा नाकारला; 'पाकिस्तान कनेक्शन' पडले महागात
12
इराणवरील लष्करी कारवाईला तूर्तास ब्रेक; अमेरिकेनं दिली चर्चेची आणखी एक ऑफर, तोडगा निघणार?
13
"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
14
Uday Samant: 'काँग्रेसचा वाण नाही, पण गुण लागला' राज ठाकरेंच्या सभेनंतर उदय सामंतांचा टोला!
15
दुपारी जेवणानंतर का येते झोप? सायंटिफीक कारण समजल्यावर तुम्हीही नक्कीच घ्याल 'पॉवर नॅप'
16
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
17
IND vs NZ: विराट-शिखरचा विक्रम धोक्यात! श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये रचणार 'असा' इतिहास
18
२०००% नं वधारला हा स्मॉलकॅप शेअर, ₹54 वर आलाय भाव; आता कंपनी ₹84 कोटींचे भांडवल उभारणार
19
तुमच्या कुटुंबाचे भविष्य करा सुरक्षित! वर्षाला फक्त २० रुपये भरा आणि मिळवा २ लाखांचे कवच
20
मतदानादिवशी ठाकरे बंधूंचे 'भगवा गार्ड' मैदानात उतरणार, दुबार, बोगस मतदारांना पकडणार आणि...
Daily Top 2Weekly Top 5

गारठयाने नाशिककरांना भरली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:44 IST

नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, गारठ्याने नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १०.८ अंश इतके नोंदविले गेले. तर त्याच वेळी निफाडचे तपमान सर्वात कमी म्हणजे ...

ठळक मुद्देपारा १०.८ अंशावर : पिकांवर परिणाम, संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ

नाशिक : शहराच्या किमान तपमानाच्या पाºयामध्ये सातत्याने घसरण सुरूच असून, गारठ्याने नाशिककरांना हुडहुडी भरल्याचे अनुभवास येत आहे. मागील चार ते पाच दिवसापांसून किमान तपमानाचा पारा घसरत असल्याने शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी (दि. २९) शहराचे किमान तपमान १०.८ अंश इतके नोंदविले गेले. तर त्याच वेळी निफाडचे तपमान सर्वात कमी म्हणजे ८.७ अंश इतके नोंदविले गेले. एकूणच मागील आठवड्याच्या तुलनेत हा आठवडा अधिक थंड राहिला आहे. गेल्या बुधवारी शहराचे किमान तपमान १८ अंशापुढे होते. शहराच्या किमान तपमानाचा पारा मागील आठवड्यात चढता राहिला; मात्र त्यानंतर पुन्हा किमान तपमानाचा पारा घसरू लागल्याने थंडीची तीव्रता शहरात वाढल्याचे जाणवत आहे.रविवारपासून हवेमध्ये कमालीचा गारवा जाणवू लागल्याने पाºयामध्येही घसरण होत आहे. या उतरत्या पाºयामुळे आणि वाढत्या थंडीमुळे पिकांवरही त्याचा परिणाम जाणवतो असून दिवाळीपुर्वीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर आता परत एकदा निसर्गाचा फटका सहन करावा लागणार की काय अशी भिती शेतकºयांकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वाढत्या गारव्यामुळे अबालवृद्धांना सर्दी, खोकला, ताप आदि संसर्गजन्य आजाराची लागण होत असून आजारांमुळे गुलाबी थंडीचा आस्वाद घेणे मुश्किल झाले आहे. एकीकडे किमान तपमानाचा पारा उतरता असला, तरी दुसरीकडे मात्र कमाल तपमानाचा पारा चढता असल्याने नाशिककरांना दिवसा उन्हाचा चटकाही जाणवत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर हवेत गारवा निर्माण होत असून, थंडी जाणवण्यास सुरुवात होत आहे. एकूणच सध्या नाशिककर हिवाळ्यासोबत उन्हाळाही अनुभवत आहेत. सकाळी १० वाजेपासून नाशिककर उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसभर उकाडाही अनुभवत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वातानुकूलन यंत्रासह पंख्याचा वापर नागरिक दुपारी करत आहेत. संध्याकाळपासून थंडीची तीव्रता जाणवण्यास सुरुवात होते. त्यामुळे गोदाकाठावर व तपोवन परिसरात उघड्यावर राहणाºया भटक्या कुटुंबीयांकडून शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर रोजी किमान तपमानाचा पारा १० अंशापर्यंत घसरला होता. यावर्षी केवळ एक अंशाने यादिवशी पारा चढता राहिला आहे.