शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जिल्ह्यातील दीडशे शाळा धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:12 IST

अहमदनगरच्या निंबोडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थी दगावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक जिल्हा परिषदेच्याही दीडशेहून अधिक प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यात शिकणाºया शेकडो विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहेत. त्यातील मंजूर असलेल्या सुमारे ७२ शाळांच्या तपासणीसाठी कार्यकारी अभियंत्यांची एक समिती नियुक्त करण्यात आल्याने पावसाळा संपत आला तरी अद्याप या शाळाखोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही.

नाशिक : अहमदनगरच्या निंबोडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थी दगावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक जिल्हा परिषदेच्याही दीडशेहून अधिक प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यात शिकणाºया शेकडो विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहेत. त्यातील मंजूर असलेल्या सुमारे ७२ शाळांच्या तपासणीसाठी कार्यकारी अभियंत्यांची एक समिती नियुक्त करण्यात आल्याने पावसाळा संपत आला तरी अद्याप या शाळाखोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही.दरम्यान, ओझर येथील जिल्हा परिषदेच्या मुले-१ व मुले-२ या दोन शाळांच्या अकरा खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी साडेपाच लाखांचा निधी डिसेंबर २०१६ पासून मंजूर असतानाही अद्याप या पडक्या शाळांच्या खोल्या दुरुस्त करण्यास जिल्हा परिषदेला मुहूर्त सापडलेला नाही. तूर्तास या ११ शाळांमध्ये रात्री मद्यपी युवकांचा सुळसुळाट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे दोनशेहून अधिक प्राथमिक शाळांमधील खोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यातील ७२ शाळा खोल्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन निधीही मंजूर करण्यात आला आहे. ओझर जिल्हा परिषदेच्या मुले-१ व मुले-२ शाळेतील सुमारे ४४० विद्यार्थी शिकत असलेल्या ११ शाळा खोल्यांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपयांप्रमाणे निधीही डिसेंबर २०१६ मध्ये दुरस्तीसाठी मंजूर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अद्याप या ११ शाळा खोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शीतल प्रकाश कडाळे यांनी मार्च २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहात जमिनीवर बसून या शाळा खोल्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते. आता निवडून आलेले अपक्ष जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांनीही शाळा दुरुस्तीच्या मुद्द्याला प्रचाराच्या जाहीरनाम्यात स्थान दिले होते. मात्र अद्यापपर्यंत या शाळा खोल्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्णातील मंजूर असलेल्या मात्र दुरुस्त न झालेल्या ७२ शाळा खोल्या तसेच सुमारे दीडशेहून अधिक शाळा खोल्यांची अवस्था जर्जर झाली आहे. या शाळांमधील विद्यार्थी जीव मुठीत धरून शाळेत बसत असल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे.