शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील दीडशे शाळा धोकादायक स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:12 IST

अहमदनगरच्या निंबोडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थी दगावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक जिल्हा परिषदेच्याही दीडशेहून अधिक प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यात शिकणाºया शेकडो विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहेत. त्यातील मंजूर असलेल्या सुमारे ७२ शाळांच्या तपासणीसाठी कार्यकारी अभियंत्यांची एक समिती नियुक्त करण्यात आल्याने पावसाळा संपत आला तरी अद्याप या शाळाखोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही.

नाशिक : अहमदनगरच्या निंबोडी गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत कोसळून तीन विद्यार्थी दगावल्याची घटना ताजी असतानाच, नाशिक जिल्हा परिषदेच्याही दीडशेहून अधिक प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पडून आहेत. त्यात शिकणाºया शेकडो विद्यार्थ्यांचे जीव टांगणीला लागल्याचे चित्र आहेत. त्यातील मंजूर असलेल्या सुमारे ७२ शाळांच्या तपासणीसाठी कार्यकारी अभियंत्यांची एक समिती नियुक्त करण्यात आल्याने पावसाळा संपत आला तरी अद्याप या शाळाखोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही.दरम्यान, ओझर येथील जिल्हा परिषदेच्या मुले-१ व मुले-२ या दोन शाळांच्या अकरा खोल्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रत्येकी साडेपाच लाखांचा निधी डिसेंबर २०१६ पासून मंजूर असतानाही अद्याप या पडक्या शाळांच्या खोल्या दुरुस्त करण्यास जिल्हा परिषदेला मुहूर्त सापडलेला नाही. तूर्तास या ११ शाळांमध्ये रात्री मद्यपी युवकांचा सुळसुळाट असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे दोनशेहून अधिक प्राथमिक शाळांमधील खोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर केले होते. त्यातील ७२ शाळा खोल्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन निधीही मंजूर करण्यात आला आहे. ओझर जिल्हा परिषदेच्या मुले-१ व मुले-२ शाळेतील सुमारे ४४० विद्यार्थी शिकत असलेल्या ११ शाळा खोल्यांना प्रत्येकी साडेपाच लाख रुपयांप्रमाणे निधीही डिसेंबर २०१६ मध्ये दुरस्तीसाठी मंजूर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अद्याप या ११ शाळा खोल्यांच्या दुरुस्तीला मुहूर्त सापडलेला नाही. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य शीतल प्रकाश कडाळे यांनी मार्च २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सभागृहात जमिनीवर बसून या शाळा खोल्या दुरुस्तीसाठी आंदोलन केले होते. आता निवडून आलेले अपक्ष जिल्हा परिषद सदस्य यतिन कदम यांनीही शाळा दुरुस्तीच्या मुद्द्याला प्रचाराच्या जाहीरनाम्यात स्थान दिले होते. मात्र अद्यापपर्यंत या शाळा खोल्या दुरुस्तीला सुरुवात झालेली नाही. जिल्ह्णातील मंजूर असलेल्या मात्र दुरुस्त न झालेल्या ७२ शाळा खोल्या तसेच सुमारे दीडशेहून अधिक शाळा खोल्यांची अवस्था जर्जर झाली आहे. या शाळांमधील विद्यार्थी जीव मुठीत धरून शाळेत बसत असल्याचा लोकप्रतिनिधींचा आरोप आहे.