शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गत वर्षभरात दीडशे अल्पवयीन मुलींचे पलायन...

By admin | Updated: April 4, 2016 00:10 IST

चिंताजनक : आठवड्यात किमान दोन अपहरणाचे गुन्हे; पोलिसांचे पालकांना आवाहन

विजय मोरे  नाशिकभाजीपाला खरेदी, शाळा, महाविद्यालय, मैत्रीण, नातेवाईक यांच्याकडे जाऊन येते, अशी विविध कारणे सांगून घराबाहेर पडलेली वयात आलेली मुलगी घरी परत आली नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे़ शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत वर्षभरात सुमारे दीडशे अल्पवयीन वा वयात आलेल्या मुली अशाप्रकारची कारणे सांगून घरातून निघून गेल्याची नोंद करण्यात आली असून, अपहरणाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत़ या प्रकारच्या घटना थांबविण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून पालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे़ पालकांचे मुलांकडील दुर्लक्ष व पौगंडावस्थेतील आकर्षणाला प्रेम समजून भविष्याचा विचार न करता घर सोडून निघून जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची संख्या अधिक असून, त्यांच्या आयुष्याची वाताहत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़ त्यापैकी एक घटना जानेवारी २०१६ मध्ये उघडकीस आली होती़ शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारी व सुखेनैव कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे महाविद्यालयातीलच एका तरुणाशी सूत जुळले़ त्यातून या मुलीने घरातून मोठी रोकड व दागिने घेऊन मुलासह पलायन केले़ यानंतर या दोघांचाही पैशांच्या कारणास्तव त्यांच्या मित्रांनीच खून केल्याचे समोर आले़नोकरी-धंद्यामुळे पालकांकडे वयात आलेल्या पाल्यांकडे (मुलगा, मुलगी) लक्ष देण्यासाठी वेळ नाही़; मात्र पाल्यांसाठीची दरमहा आर्थिक तरतूद, अत्याधुनिक सोयी-सुविधा, संपर्काची जलद साधने (मोबाइल, इंटरनेट) व स्वातंत्र्य पुरेपूर कसे मिळेल याची ते आवर्जून काळजी घेतात़ पालकांच्या या अतिकाळजीचा वा स्वातंत्र्याचा गैरफायदा पाल्यांकडून घेतला जातो की काय? अशी भयावह परिस्थिती आहे़ शहरात आठवड्यातून किमान दोन-तीन अल्पवयीन मुली घर सोडून निघून जात असल्याचे समोर आले आहे़