शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

गत वर्षभरात दीडशे अल्पवयीन मुलींचे पलायन...

By admin | Updated: April 4, 2016 00:10 IST

चिंताजनक : आठवड्यात किमान दोन अपहरणाचे गुन्हे; पोलिसांचे पालकांना आवाहन

विजय मोरे  नाशिकभाजीपाला खरेदी, शाळा, महाविद्यालय, मैत्रीण, नातेवाईक यांच्याकडे जाऊन येते, अशी विविध कारणे सांगून घराबाहेर पडलेली वयात आलेली मुलगी घरी परत आली नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे़ शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गत वर्षभरात सुमारे दीडशे अल्पवयीन वा वयात आलेल्या मुली अशाप्रकारची कारणे सांगून घरातून निघून गेल्याची नोंद करण्यात आली असून, अपहरणाचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत़ या प्रकारच्या घटना थांबविण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश पाठवून पालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे़ पालकांचे मुलांकडील दुर्लक्ष व पौगंडावस्थेतील आकर्षणाला प्रेम समजून भविष्याचा विचार न करता घर सोडून निघून जाणाऱ्या अल्पवयीन मुलींची संख्या अधिक असून, त्यांच्या आयुष्याची वाताहत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत़ त्यापैकी एक घटना जानेवारी २०१६ मध्ये उघडकीस आली होती़ शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणारी व सुखेनैव कुटुंबातील अल्पवयीन मुलीचे महाविद्यालयातीलच एका तरुणाशी सूत जुळले़ त्यातून या मुलीने घरातून मोठी रोकड व दागिने घेऊन मुलासह पलायन केले़ यानंतर या दोघांचाही पैशांच्या कारणास्तव त्यांच्या मित्रांनीच खून केल्याचे समोर आले़नोकरी-धंद्यामुळे पालकांकडे वयात आलेल्या पाल्यांकडे (मुलगा, मुलगी) लक्ष देण्यासाठी वेळ नाही़; मात्र पाल्यांसाठीची दरमहा आर्थिक तरतूद, अत्याधुनिक सोयी-सुविधा, संपर्काची जलद साधने (मोबाइल, इंटरनेट) व स्वातंत्र्य पुरेपूर कसे मिळेल याची ते आवर्जून काळजी घेतात़ पालकांच्या या अतिकाळजीचा वा स्वातंत्र्याचा गैरफायदा पाल्यांकडून घेतला जातो की काय? अशी भयावह परिस्थिती आहे़ शहरात आठवड्यातून किमान दोन-तीन अल्पवयीन मुली घर सोडून निघून जात असल्याचे समोर आले आहे़