शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शेकडो विद्युत खांब जमीनदोस्त

By admin | Updated: June 6, 2014 23:53 IST

यंत्रणा कोलमडली : गिरणारे केंद्रात ३३ केव्हीवर झाड पडल्याने लाखोंचे नुकसान

नाशिक : जिल्ह्यात वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी वीज यंत्रणा कोलमडून पडल्याने अगोदरच भारनियमनामुळे त्रस्त जनतेला खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. दर पावसाळ्यात वीज वितरण व्यवस्था कोलमडत असल्यामुळे महावितरणच्या देखभाल-दुरुस्ती कामाचीही पोलखोल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात वीज यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. ही नैसर्गिक आपत्ती असल्याने वीजपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा कंपनीकडून केला जात असला, तरी सक्षम कामे होत नसल्यामुळेच वीजपुरवठा सुरळीत होण्यास दोन ते तीन दिवस लागत असल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे. शहरातील देवळाली कँप, सातपूर, सिडको, जुने नाशिक, गोविंदनगर, पंचवटी, भगूर, गंगापूर, आडगाव, सामनगाव, शिंदे, पळसे, गिरणारे, हरसूल आदि परिसरातील वीज यंत्रणा सातत्याने प्रभावित होत असल्याचे वीज कंपनीनेच म्हटले आहे. मालेगाव, निफाड, तसेच नगर जिल्ह्यातील घोडेगाव, राहुरी, नगर येथे वादळाच्या तडाख्याने अनेक झाडे आणि फांद्या वीजतारांवर पडल्यामुळे यंत्रणा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी तर विद्युतखांब, रोहित्र उन्मळून पडले आहेत. गिरणारे उपकेंद्रात १५० फूट उंचीचा निलगिरीचा वृक्ष ३३ केव्ही वाहिनीवर पडल्याने महावितरणचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक ठिकाणी विद्युत खांबांवरील इन्सुलेटर फुटून वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. (प्रतिनिधी)