शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्याने सदैव सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:13 IST

संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.

ठळक मुद्देशंकराचार्य विधुशेखर भारती : कैलास मठात पाद्यपूजन सोहळा

पंचवटी : संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले. पेठरोडवरील कैलासनाथ भक्तिधाम येथे शनिवारी (दि.१२) सायंकाळी शृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य पाद्यपूजा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.शनिवारी सायंकाळी शंकराचार्यांनी कैलास मठास भेट दिली त्यावेळी शंकराचार्यांचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी अवतार घेऊन सनातन धर्माचा उद्धार केला आहे. प्रत्येक व्यक्तीला धर्म मार्गात जाण्याची प्रेरणा दिली आहे. आश्रमात सर्वश्रेष्ठ संन्यास आश्रम आहे. शंकराचार्य नसते तर आपण वैदिक विद्या बघू शकलो नसतो. शंकराचार्यांविषयी श्रद्धेने राहायला पाहिजे. या पाद्यपूजन सोहळ्याला स्वामी रामतीर्थजी महाराज, निश्चयानंद महाराज, श्याम चैतन्य, ब्रह्मदत्त शर्मा, स्वामी अलोकानंदा, डॉ. दिनेश बच्छाव, आर. आर. पाटील, भालचंद्र शेवचे आदींसह भाविक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम