शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मनुष्याने सदैव सत्कर्म करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:13 IST

संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले.

ठळक मुद्देशंकराचार्य विधुशेखर भारती : कैलास मठात पाद्यपूजन सोहळा

पंचवटी : संन्यासातून शाश्वत फलप्राप्ती होत असते. सदैव चांगले कर्म केले पाहिजे. मन, चित्त शुद्धीसाठी कर्माचे अनुष्ठान करावे व नंतर ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करावा, असे प्रतिपादन दक्षिणाम्नाय शृंगेरी शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती महास्वामी यांनी केले. पेठरोडवरील कैलासनाथ भक्तिधाम येथे शनिवारी (दि.१२) सायंकाळी शृंगेरी जगद्गुरू शंकराचार्य पाद्यपूजा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.शनिवारी सायंकाळी शंकराचार्यांनी कैलास मठास भेट दिली त्यावेळी शंकराचार्यांचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जगद्गुरू शंकराचार्यांनी आपल्या देशात हजारो वर्षांपूर्वी अवतार घेऊन सनातन धर्माचा उद्धार केला आहे. प्रत्येक व्यक्तीला धर्म मार्गात जाण्याची प्रेरणा दिली आहे. आश्रमात सर्वश्रेष्ठ संन्यास आश्रम आहे. शंकराचार्य नसते तर आपण वैदिक विद्या बघू शकलो नसतो. शंकराचार्यांविषयी श्रद्धेने राहायला पाहिजे. या पाद्यपूजन सोहळ्याला स्वामी रामतीर्थजी महाराज, निश्चयानंद महाराज, श्याम चैतन्य, ब्रह्मदत्त शर्मा, स्वामी अलोकानंदा, डॉ. दिनेश बच्छाव, आर. आर. पाटील, भालचंद्र शेवचे आदींसह भाविक उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम