शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

धक्कादायक! बंद गाळ्यात आढळले आठ मानवी कान, मेंदू, डोळे; नाशिकमध्ये एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 08:32 IST

नाशिक: मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरिविहार सोसायटीतील २० आणि २१ क्रमांकांचे दोन गाळे आहेत. हे गाळे मागील अनेक ...

नाशिक: मुंबई नाका पोलीस ठाण्यामागे असलेल्या हरिविहार सोसायटीतील २० आणि २१ क्रमांकांचे दोन गाळे आहेत. हे गाळे मागील अनेक वर्षांपासून बंद होते. यांपैकी एका गाळ्यातून विचित्र प्रकारची दुर्गंधी नागरिकांना मागील दोन दिवसांपासून येत होती. त्यामुळे दुर्गंधी कोठून येते याचा रहिवासी शोध घेत होते. रविवारी गाळ्याच्या शटरचा पत्रा एका बाजूने कुजलेला असल्याचे दिसले. तेथून दुर्गंधी सुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचा ‘डायल ११२’ क्रमांक फिरवून माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला.उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल, आनंदा वाघ, सुनील रोहकले यांसह न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा चमू (फॉरेन्सिक) घटनास्थळी काही वेळेत पाेहोचला. गाळा उघडला असता त्यामध्ये सर्व भंगार माल साठवून ठेवलेला आढळला. यामध्ये लाकडी साहित्यापासून विविध लोखंडी वस्तू होत्या. या भंगारात प्लास्टिकचे दोन डबे वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असल्याचा पोलिसांना संशय आल्याने ते डबे जेव्हा पोलिसांनी उघडले तेव्हा दुर्गंधीचा एकच लोट पसरला. पोलिसांनी नाकातोंडाला मास्क लावून बॅटरीच्या साहाय्याने पाहणी केली असता द्रव रसायनामध्ये मानवी अवयव जतन करून ठेवण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. फॉरेन्सिक चमूने हे दोन्ही डबे ताब्यात घेतले. पोलिसांनी गाळामालक महिला शुभांगिनी शिंदे यांना बोलाविले. तसेच त्यांच्या दोन्ही मुलांना जे डॉक्टर आहेत, त्यांनाही पोलिसांनी या ठिकाणी बोलावून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलीस ठाण्यात चौकशी सुरू होती.

वैद्यकीय अभ्यासाकरिता अवयव ठेवल्याचा संशयशिंदे कुटुंबीयांची दोन्ही मुले शहरात डॉक्टर आहेत. एक डेन्टिस्ट, तर दुसरा कान, नाक, घसा तज्ज्ञ आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी या गाळ्यात मानवी अवयव वैद्यकशास्त्राच्या अभ्यासासाठी आणले असावे, असा पोलिसांना प्रथमदर्शनी संशय आहे. याबाबत दोन्ही डॉक्टर बंधूंनी घटनास्थळी पोलिसांना कुठल्याही प्रकारची ठोस माहिती सांगितली नाही. गाळा यापूर्वी कोणाला भाडेतत्त्वावर दिला होता? हेदेखील त्यांना सांगता आले नाही. यामुळे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मानवी अवयव ज्या पद्धतीने जतन करून ठेवले गेले ती पद्धत वैद्यकशास्त्राशी निगडित वाटते. अवयवांची कापणीदेखील अत्यंत शार्प असून आठ कान डब्यातून मिळालेले आहेत. तसेच मेंदूसदृश काही अवयवही आढळले आहेत. गाळा ज्यांचा आहे, ते दोन्ही भाऊ डाॅक्टर असून त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली जात आहे. त्यांच्या या गाळ्यात मागील इतक्या वर्षांपासून मानवाचे हे अवयव कसे आले व कोठून आणले याचा तपास सुरू आहे.- पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त