शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनासाठी मानवी साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:08 IST

नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले.

ठळक मुद्देप्रबोधन मंच : सोळा ठिकाणी फलक घेऊन केले समर्थन ; युवती, नागरिकांच्या हातात घोषणांचे फलक

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नागरिकत्व कायद्यातील सुधारणेचे समर्थन करण्यासाठी शहरात विविध ठिकाणच्या सोळा मार्गांवर मानवी साखळी करण्यात आली. आम्ही नागरिकत्व कायद्याचे समर्थन करीत असल्याचे फलक यावेळी झळकविण्यात आले.केंद्र सरकारने केलेल्या कायद्यातील सुधारणांबाबत समर्थन आणि विरोध अशा दोन्ही प्रकारची आंदोलने नाशिकमध्ये होत आहेत. मात्र प्रबोधन मंच या संस्थेच्या माध्यमातून शहराच्या सहा विभागांत तसेच देवळाली आणि भगूर येथेही मानवी साखळी उपक्रम राबविण्यात आला. वंदे मातरम, भारत माता की जय असे फलक झळकावून शांततामय मार्गाने हा उपक्रम राबविण्यात आला. यात कॉलेजरोड, मेरी रोड, मानूर नाका, पंचवटी कारंजा, सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सातपूर बसस्थानक, पवननगर, शिवाजी चौक, माउली लॉन्स, रथचक्र सोसायटी, पाथर्डी फाटा, काठेगल्ली, बिटको चौक, जेलरोड, जुने बस स्टॅन्ड देवळाली तसेच भगूर येथे या प्रकारचे समर्थन करण्यात आले.दरम्यान नाशिकरोड येथील बिटको चौकात प्रबोधन मंच, भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी सायंकाळी मानवी साखळी करण्यात आली.वंदे मातरम, भारत माता की जयच्या घोषणा देत प्रबोधन मंचच्या वतीने नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ सावरकर चौक ते साईनाथनगर चौफुलीपर्यंत मानवी साखळी करण्यात आली होती. यावेळी देश के हित मे सबके हित मे, काश्मीर ते कन्याकुमारी भारत माता एक हमारी, भारतीय संविधानाचा विजय असो, सह विविध फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. याप्रसंगी मनपा सभागृहनेता सतीश सोनवणे, नगरसेवक अ‍ॅड. श्याम बडोदे, नगरसेवक अजिंक्य साने, राजश्री शौचे, अ‍ॅड. भानुदास शौचे, सचिन कुलकर्णी, अनिकेत सोनवणे, बापू गोरे, सह आबालवृद्ध सहभागी झाले होते.

टॅग्स :Human Traffickingमानवी तस्करीNashikनाशिक