शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककरांना भरतेय हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST

गेल्या गुरुवारी (दि.२१) पहाटे अचानकपणे नागरिकांना थंडीचा कडाका जाणवला होता. शहरात किमान तापमानाचा पारा थेट १४ अंशांवरून ११.४ अंशांपर्यंत ...

गेल्या गुरुवारी (दि.२१) पहाटे अचानकपणे नागरिकांना थंडीचा कडाका जाणवला होता. शहरात किमान तापमानाचा पारा थेट १४ अंशांवरून ११.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून त्यादिवशी करण्यात आली ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली होती. त्यानंतर पुन्हा पारा पुन्हा दोन दिवस १४ अंशांपर्यंत वर सरकला होता; मात्र, साेमवारी पुन्हा १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचे शहरात जोरदार पुनरागमन झाले आहे.

२० तारखेनंतर नाशिककरांना थंडीची तीव्रता जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता. या

मागील १० वर्षांमध्ये जानेवारीत नाशकात मोठ्या प्रमाणात किमान तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतो. यावर्षी लहरी निसर्गामुळे जानेवारीचा पंधरवडा उलटूनही थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नाशिककरांना येत नव्हता; मात्र महिन्याच्या अखेरचा आठवडा सुरू होत असताना आता पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. हळूहळू दिवसा व रात्रीसुद्धा आकाश निरभ्र राहण्यास सुरुवात होऊ लागल्याने किमान तापमानात आता घट होत आहे. प्रजासत्ताक दिनानंतर पुढील काही दिवस शहरात थंडीचा कडाका अनुभवयास येऊ शकतो. किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंतही घसरण्याची शक्यता हवामान निरीक्षण केंद्राचे प्रमुख सुनील काळभोर यांनी व्यक्त केली आहे.

---इन्फो---

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव

उत्तरेकडून येणारे वारे हे थंड असून, या वाऱ्यांचा वेग हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दिल्लीमार्गे मध्यप्रदेश व महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव आता हवामानावर होताना दिसत आहे. उत्तरेचे थंड वारे आणि रात्रीच्या सुमारास दक्षिण-पूर्वेकडील वाहणारे वारे यामुळे थंडीची तीव्रता येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रात वाढणार आहे. दिल्लीमध्ये थंडीची लाट आली असून किमान तापमान ४ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. यामुळे राज्यातसुद्धा थंडीची तीव्रता आता वाढणार असून उत्तर महाराष्ट्र अधिक गारठला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.