शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

ठेकेदारांची भरती केल्यावर कार्यकर्त्यांना शक्ती कशी लाभेल?

By किरण अग्रवाल | Updated: August 4, 2019 02:08 IST

प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते हेच कोणत्याही पक्षाची शक्ती असतात. पण, संधी लाटून घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होऊ लागल्याने भाजपतील मूळ कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. ठेकेदारांनी पक्ष चालत नाही, हे खरे असेल तर अशा ठेकेदारांसाठी पायघड्या अंथरताच कशाला, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो.

ठळक मुद्देभाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न ठीकवास्तविकतेकडे दुर्लक्षच !पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित

सारांशसत्तेची अगर यशाची गणिते जुळविण्यासाठी कधी कधी तडजोडी कराव्या लागतात व त्यास कोणताही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकलेला नाही हे खरेच; पण भरल्या पोटीही अजीर्णतेला निमंत्रण देण्यासारखी वाटचाल घडून येते तेव्हा निष्ठावानांमधील अस्वस्थता वाढून जाणे स्वाभाविक ठरून जाते. भाजपतही तेच वा तसेच होताना दिसत आहे, म्हणूनच पक्ष ठेकेदार नव्हे तर कार्यकर्तेच चालवतात, अशी पोपटपंची करून ही पक्षांतर्गत धुसफूस शमविण्याचा प्रयत्न करण्याची वेळ या पक्षाच्या पदाधिकाºयावर आलेली पहावयास मिळाले.भाजपच्या निवडणूक तयारीचा भाग म्हणून शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा नुकताच नाशकात झाला. पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाला शक्ती देण्याचे कार्य या कार्यकर्त्यांना करायचे आहे, पण त्यांनी पक्षाला शक्ती मिळवून दिल्यावर सत्तेचे लाभ पदरात पाडून घ्यायला मात्र अन्य पक्षात शक्ती न उरलेले लोक भाजपत येऊ लागल्याने निष्ठावानांतच चलबिचल होताना दिसत आहे. म्हणूनच या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांना ‘पक्ष ठेकेदारांच्या भरोशावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो’, असे म्हणून उपस्थितांना गोंजारावे लागले. अर्थात, सतीश जे म्हणाले त्यात गैर काहीच नाही. कोणताही पक्ष हा निष्ठावानांच्याच बळावर चालतो याबद्दल दुमत असू शकत नाही. प्रश्न असा आहे की, जर ते खरे आहे तर मग संधी व लाभासाठी परपक्षातून येणाºया ठेकेदारांना घेताच कशासाठी?

सतरंज्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून उचलून घ्यायच्या, संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्या शक्तीचा वापर करून घ्यायचा आणि नंतर लाभाचे भरलेले ताट मात्र अन्य पक्षांतून आलेल्यांच्या पुढे करायचे, या अलीकडे भाजपत प्रचलित होऊ पाहणाºया पद्धतीने निष्ठावान नाराज आहेत. यासाठी आणखी कुणाकडे पाहण्याची गरज नाही. नाशिक महापालिकेतलेच उदाहरण घ्या. तेथे सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी भाजपने घाऊकपणे भरतीप्रक्रिया राबविली. कमळाचे देठ हाती धरून असे उधार-उसनवारीचे खूप लोक निवडूनही आले. त्यानंतर पालिकेतील पदे देताना या बाहेरून आलेल्यांनाच संधी दिली गेली. पक्षाच्या नादारीच्या काळात एकनिष्ठेने खस्ता खाल्लेल्यांना मात्र शुल्लक पदांसाठी पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे चपला झिजवायची वेळ आली. इतकेच काय ‘मनसे’ सोडून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनाही त्यांच्या वॉर्डातील कामे करण्यासाठी बळ दिले गेले नाही. मोजक्यांनीच आपली कामे रेटून नेलीत. म्हणजे, पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित. मग पुन्हा भरतीचा सोस कशासाठी?नव्या लोकांना त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच प्रवेश दिला जातो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे; पण अशा कर्तृत्ववानांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगर समर्थकांना पक्षकार्याला जुंपलेले दिसत नाही. त्यांना तिकीट दिले तरच त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडतात. म्हणजे व्यक्तीसाठी त्यांचा प्रचार असतो, पक्षासाठी नसतो. तेव्हा व्ही. सतीश यांचे विधान कार्यकर्त्यांना सुखावणारे असले तरी, वास्तवातील त्यांच्या अस्वस्थतेच्या कारणांकडे दुर्लक्ष करता येऊ नये.महत्त्वाचे म्हणजे, अच्छे दिनाच्या अपेक्षेने अनेकांचा ओढा भाजपकडे असला तरी तिथे यापूर्वी प्रवेश मिळवून बाहेरचे ठरवले गेलेल्यांची अवस्था काय हे विचारातच घेतले जात नाही. ज्यांनी प्रवेशासोबतच कसली का होईना संधी किंवा तिकीट मिळवून विजयही मिळवला त्यांचे भले झाले हा अपवाद; परंतु जे प्रतीक्षेतच आहेत त्यांचे काय? आज नंबर लागेल, उद्या लागेल या आशेवर असलेले असे अनेकजण केवळ सभा-संमेलनांप्रसंगी व्यासपीठावर गौर मांडल्यासारखे बसवलेले दिसून येतात, त्यांना कुणी जमेतही धरत नाही, तरी केवळ सत्ताधारी पक्षात असल्याचे समाधान बाळगत ते थांबून आहेत. अशांकडून पक्षकार्याची अपेक्षाच करता येऊ नये. अन्यथा, भाजपत येणाऱ्यांची गर्दी होत असताना दोन वर्षांपूर्वी या पक्षात आलेल्या माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्यासारख्यांची शिवसेनेत घरवापसी झालीच नसती. कल्याणरावांनी दोनदा आमदारकी भूषविली, आता ते राजकारणात फारसे सक्रियही नाहीत. बरे, उमेदवारीसाठी ते शिवसेनेत आले म्हणायचे तर तिथे अगोदरच अनेक दावेदार आहेत. तरीदेखील कल्याणरावांनी भाजप सोडला. त्यांच्या या उलट प्रवाहामागील अन्वयार्थ खरे तर भाजपकडे धावणाºयांनी समजून घ्यायला हवा, पण चालत्या गाडीत बसायला इच्छुक असणारे अन्य धोके लक्षात घेत नाहीत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक