शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

ठेकेदारांची भरती केल्यावर कार्यकर्त्यांना शक्ती कशी लाभेल?

By किरण अग्रवाल | Updated: August 4, 2019 02:08 IST

प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते हेच कोणत्याही पक्षाची शक्ती असतात. पण, संधी लाटून घेणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात भरती होऊ लागल्याने भाजपतील मूळ कार्यकर्त्यांची घुसमट होऊ लागली आहे. ठेकेदारांनी पक्ष चालत नाही, हे खरे असेल तर अशा ठेकेदारांसाठी पायघड्या अंथरताच कशाला, असा प्रश्न त्यामुळेच उपस्थित होतो.

ठळक मुद्देभाजपच्या शक्ती केंद्रप्रमुखांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न ठीकवास्तविकतेकडे दुर्लक्षच !पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित

सारांशसत्तेची अगर यशाची गणिते जुळविण्यासाठी कधी कधी तडजोडी कराव्या लागतात व त्यास कोणताही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकलेला नाही हे खरेच; पण भरल्या पोटीही अजीर्णतेला निमंत्रण देण्यासारखी वाटचाल घडून येते तेव्हा निष्ठावानांमधील अस्वस्थता वाढून जाणे स्वाभाविक ठरून जाते. भाजपतही तेच वा तसेच होताना दिसत आहे, म्हणूनच पक्ष ठेकेदार नव्हे तर कार्यकर्तेच चालवतात, अशी पोपटपंची करून ही पक्षांतर्गत धुसफूस शमविण्याचा प्रयत्न करण्याची वेळ या पक्षाच्या पदाधिकाºयावर आलेली पहावयास मिळाले.भाजपच्या निवडणूक तयारीचा भाग म्हणून शक्ती केंद्रप्रमुखांचा मेळावा नुकताच नाशकात झाला. पक्षाची भूमिका, ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाला शक्ती देण्याचे कार्य या कार्यकर्त्यांना करायचे आहे, पण त्यांनी पक्षाला शक्ती मिळवून दिल्यावर सत्तेचे लाभ पदरात पाडून घ्यायला मात्र अन्य पक्षात शक्ती न उरलेले लोक भाजपत येऊ लागल्याने निष्ठावानांतच चलबिचल होताना दिसत आहे. म्हणूनच या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी आलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश यांना ‘पक्ष ठेकेदारांच्या भरोशावर नव्हे तर कार्यकर्त्यांच्या बळावर चालतो’, असे म्हणून उपस्थितांना गोंजारावे लागले. अर्थात, सतीश जे म्हणाले त्यात गैर काहीच नाही. कोणताही पक्ष हा निष्ठावानांच्याच बळावर चालतो याबद्दल दुमत असू शकत नाही. प्रश्न असा आहे की, जर ते खरे आहे तर मग संधी व लाभासाठी परपक्षातून येणाºया ठेकेदारांना घेताच कशासाठी?

सतरंज्या पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून उचलून घ्यायच्या, संघटनात्मक बांधणीसाठी त्यांच्या शक्तीचा वापर करून घ्यायचा आणि नंतर लाभाचे भरलेले ताट मात्र अन्य पक्षांतून आलेल्यांच्या पुढे करायचे, या अलीकडे भाजपत प्रचलित होऊ पाहणाºया पद्धतीने निष्ठावान नाराज आहेत. यासाठी आणखी कुणाकडे पाहण्याची गरज नाही. नाशिक महापालिकेतलेच उदाहरण घ्या. तेथे सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी भाजपने घाऊकपणे भरतीप्रक्रिया राबविली. कमळाचे देठ हाती धरून असे उधार-उसनवारीचे खूप लोक निवडूनही आले. त्यानंतर पालिकेतील पदे देताना या बाहेरून आलेल्यांनाच संधी दिली गेली. पक्षाच्या नादारीच्या काळात एकनिष्ठेने खस्ता खाल्लेल्यांना मात्र शुल्लक पदांसाठी पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांकडे चपला झिजवायची वेळ आली. इतकेच काय ‘मनसे’ सोडून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांनाही त्यांच्या वॉर्डातील कामे करण्यासाठी बळ दिले गेले नाही. मोजक्यांनीच आपली कामे रेटून नेलीत. म्हणजे, पक्षनिष्ठही नाराज आणि परपक्षातून घेतलेलेही काहीजण उपेक्षित. मग पुन्हा भरतीचा सोस कशासाठी?नव्या लोकांना त्यांचे कार्य, कर्तृत्व आणि स्थान पाहूनच प्रवेश दिला जातो असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे; पण अशा कर्तृत्ववानांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना अगर समर्थकांना पक्षकार्याला जुंपलेले दिसत नाही. त्यांना तिकीट दिले तरच त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडतात. म्हणजे व्यक्तीसाठी त्यांचा प्रचार असतो, पक्षासाठी नसतो. तेव्हा व्ही. सतीश यांचे विधान कार्यकर्त्यांना सुखावणारे असले तरी, वास्तवातील त्यांच्या अस्वस्थतेच्या कारणांकडे दुर्लक्ष करता येऊ नये.महत्त्वाचे म्हणजे, अच्छे दिनाच्या अपेक्षेने अनेकांचा ओढा भाजपकडे असला तरी तिथे यापूर्वी प्रवेश मिळवून बाहेरचे ठरवले गेलेल्यांची अवस्था काय हे विचारातच घेतले जात नाही. ज्यांनी प्रवेशासोबतच कसली का होईना संधी किंवा तिकीट मिळवून विजयही मिळवला त्यांचे भले झाले हा अपवाद; परंतु जे प्रतीक्षेतच आहेत त्यांचे काय? आज नंबर लागेल, उद्या लागेल या आशेवर असलेले असे अनेकजण केवळ सभा-संमेलनांप्रसंगी व्यासपीठावर गौर मांडल्यासारखे बसवलेले दिसून येतात, त्यांना कुणी जमेतही धरत नाही, तरी केवळ सत्ताधारी पक्षात असल्याचे समाधान बाळगत ते थांबून आहेत. अशांकडून पक्षकार्याची अपेक्षाच करता येऊ नये. अन्यथा, भाजपत येणाऱ्यांची गर्दी होत असताना दोन वर्षांपूर्वी या पक्षात आलेल्या माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्यासारख्यांची शिवसेनेत घरवापसी झालीच नसती. कल्याणरावांनी दोनदा आमदारकी भूषविली, आता ते राजकारणात फारसे सक्रियही नाहीत. बरे, उमेदवारीसाठी ते शिवसेनेत आले म्हणायचे तर तिथे अगोदरच अनेक दावेदार आहेत. तरीदेखील कल्याणरावांनी भाजप सोडला. त्यांच्या या उलट प्रवाहामागील अन्वयार्थ खरे तर भाजपकडे धावणाºयांनी समजून घ्यायला हवा, पण चालत्या गाडीत बसायला इच्छुक असणारे अन्य धोके लक्षात घेत नाहीत.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक