शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

प्रशिक्षण केंद्रच कसे अडकले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:45 IST

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अवघ्या दीड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण केंद्राचा वापर होत नसल्याने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीने त्याबाबत आयुक्तांना पाचारण केले खरे, परंतु केवळ हे केंद्रच नव्हे तर या प्रकल्पातील अनेक यंत्रसामग्री वापराविना पडून आहे,

नाशिक : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अवघ्या दीड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण केंद्राचा वापर होत नसल्याने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीने त्याबाबत आयुक्तांना पाचारण केले खरे, परंतु केवळ हे केंद्रच नव्हे तर या प्रकल्पातील अनेक यंत्रसामग्री वापराविना पडून आहे, शिवाय नेहरू अभियानातील कोट्यवधी रुपयांच्या योजना संशयाच्या फेऱ्यात असताना केवळ एकाच केंद्राबाबत आलेल्या आक्षेपामुळे पालिकावर्तुळातच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  महापालिकेच्या कामकाजाचे प्रशासन आॅडिट करतेच, परंतु त्यापलीकडे जाऊन राज्य शासनाचा लेखा विभागदेखील आॅडिट करते, अनेक बाबी विधिमंडळाच्या लोकलेखा समितीसमोर आल्यानंतर त्याबाबतच्या आक्षेपांबाबत समिती निराकरण करीत असते. या समितीने आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाचारण केले होते. पाथर्डी शिवारात महापालिकेचा घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प असून, याठिकाणी दीड कोटी रुपये खर्च करून प्रशिक्षण केंद्र बांधण्यात आले आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण आजवर दिले गेलेले नाही. त्यामुळे वापराविना पडून असलेल्या या केंद्राबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यावर कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण योजना सुरू करण्याची हमी आयुक्तांनी दिली. परंतु मुळातच नेहरू अभियानांतर्गत हा संपूर्ण खत प्रकल्पच वादग्रस्त ठरला आहे.  नेहरू अभियानांतर्गत महापालिकेने ६० कोटी रुपयांचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात आला होता. घंटागाड्या खरेदीपासून अनेक प्रकारची यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली. घंटागाड्या खरेदी करून दीड पावणे दोन वर्षे वापराविना पडूनच होत्या. कचरा संकलित झाल्यानंतर त्यापासून सेंद्रिय खत आणि आरडीएफ म्हणजे कांडी कोळसा तयार करण्याबरोबरच कचºयात येणाºया सीमेंट, वाळूपासून पेव्हर ब्लॉक तयार करण्याचादेखील प्रकल्प होता. परंतु पेव्हर ब्लॉक आजवर तयारच झाले नाहीत. सदरची यंत्रसामग्री पडून असल्याबद्दल अनेकदा चर्चा झाल्या आहेत, परंतु त्याची दखल गांभिर्याने घेतली गेली नाही.या आहेत वादग्रस्त योजनाघनकचरा व्यवस्थापनाप्रमाणेच केंद्र सरकारच्या नेहरू नागरी अभियानांतर्गत पावसाळी गटार योजना, शहरी गरिबांसाठी घरे अंतर्गत घरकुल योजना, नदीकाठ सुशोभिकरण यादेखील गैरव्यवहारामुळे वादात सापडल्या होत्या. यातील काही योजनांची चौकशी झाली होती. आजही त्यांचा उपयोग हा वादाचा विषय असताना ३००-३५० कोटी रुपयांच्या योजनांचा विचार नाही आणि अवघ्या दीड कोटी रुपयांसाठी आयुक्तांवर हजेरीची नामुष्की आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका